शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पाणी वाटपाचा चेंडू शासनाकडे

By admin | Updated: November 4, 2014 01:40 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानंतर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने वेगवेगळ्या सूत्रांनुसार वरच्या भागातील

औरंगाबाद : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानंतर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने वेगवेगळ्या सूत्रांनुसार वरच्या भागातील धरणांमधून जायकवाडीत किती पाणी सोडले जाऊ शकते, याचा अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविला आहे. सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतरच जायकवाडीत पाणी सोडण्याची कारवाई केली जाईल, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.जायकवाडीच्या हक्काचे पाणी नगर, नाशिक जिल्ह्यांत अडविले जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातून समन्यायी पाणीवाटपाची मागणी होत आहे.४गोदावरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जायकवाडीच्या पाण्याबाबत अहवाल सादर केला असता त्याविषयी अतिशय सावध भूमिका घेतली आहे. शासनाला कोणकोणत्या गरजा भागवून किती पाणी शिल्लक राहते आणि त्यानंतर किती पाणी सोडता येऊ शकते, याची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. मात्र, ही आकडेवारी जाहीर करण्यास अधिकारी तयार नाहीत. पाण्याचा विषय अतिशय संवदेनशील आहे. ४यावर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्ही विभागांतील लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे आता एखादी आकडेवारी जाहीर केली आणि नंतर तो पर्याय स्वीकारण्यात आला नाही, तर उगीच वाद उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या हे जाहीर करणे योग्य नाही, असा खुलासा कार्यकारी संचालक सी.ए. बिराजदार यांनी केला.