शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनसाठी लातुरात वाव

By admin | Updated: June 16, 2015 00:49 IST

पंकज जैस्वाल / महेश पाळणे , लातूर लातूर शहरात एक-दोन नव्हे तर बॅडमिंटनचे तब्बल १९ कोर्ट आहेत़ त्यातच लातूर जिल्हा बॅडमिंटन संघटनाही खेळाडू घडवीत आहे़ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू चमकण्यासाठी

पंकज जैस्वाल / महेश पाळणे , लातूरलातूर शहरात एक-दोन नव्हे तर बॅडमिंटनचे तब्बल १९ कोर्ट आहेत़ त्यातच लातूर जिल्हा बॅडमिंटन संघटनाही खेळाडू घडवीत आहे़ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू चमकण्यासाठी लातुरातही वाव आहे़ आज मितीला बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील चॅलेंज स्पर्धा लातूरच्या १९ कोर्टवर घेतल्या जावू शकतात, असे मत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू तथा आॅलम्पियन निखील कानेटकर यांनी व्यक्त केले़लातूर जिल्हा बॅडमिंटन असोशिएशनच्या वतीने लातुरातील शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी आले असता, ‘लोकमत’शी त्यांनी खास बातचित केली़ येणाऱ्या काळात क्रिकेटपेक्षाही चांगले दिवस बॅडमिंटनला येणार आहेत़ बॅडमिंटनसाठी लातूरला पोषक वातावरण आहे़ परंतु खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे़ गेल्या पाच वर्षांपासून पुणे येथील शिबिरात लातूरच्या खेळाडूंचा हिरीरीने सहभाग असल्याचे सांगत लातूरच्या खेळाडूतही गुणवत्ता ठासून भरली आहे़ बॅडमिंटनसाठी येथे वातावरण तर आहेच मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकायचे असल्यास बॅडमिंटनचे अचुक कौशल्य हस्तगत करणे गरजेचे आहे़ येथील जिल्हा संघटनाही बॅडमिंटन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहे़ यासह खेळाडूंंच्या कौशल्यवाढीसाठी अधिक भर देणे गरजेचे असल्याचे सांगत कानेटकर म्हणाले, आदित्य माळी, अशिष बंग यांच्यासह अनेक खेळाडू लातूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवू शकतात. लातुरातील दयानंद महाविद्यालय, क्रीडा संकुल येथे प्रत्येकी चार कोर्ट आहेत़ एसएमआर स्वीमिंग पूल येथे तीन कोर्ट आहेत़ तहसीलमागील बचत भवन, बांधकाम भवन, बनसोडे हॉल, बाभळगाव पोलिस मुख्यालय येथे प्रत्येकी एक बॅडमिंटन कोर्ट आहे़ लातुरातील हे कोर्ट उच्च प्रतिचे असल्याचे कानेटकर यांनी सांगितले़ मूळचे पुण्याचे निखिल कानेटकर यांनी २००४ मध्ये अथेन्स आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले़ तसेच मलेशिया, बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधीत्त्व केले़ मलेशिया व जपान येथे झालेल्या थॉमस कप स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरी गाठली होती़ दोहा येथे झालेल्या एशियन स्पर्धेत व अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेतही त्यांचा सहभाग होता़ बॅडमिंटन खेळात शारीरिक हालचाली, अचुक नजर आणि योग्य समन्वयाला महत्व आहे़ या तिन्ही गोष्टीवर खेळाडूंनी अधिक भर देणे गरजेचे आहे़ यातूनच त्यांच्या खेळाचा विकास होईल, यासह शारीरीक तंदुरुस्ती वाढविण्यासाठी वेट ट्रेनिंग, मॅराथॉन, सर्किट ट्रेनिंग यांचा लाभ होऊ शकतो़ यासोबतच योग्य आहार व विहारही गरजेचे आहे़ खेळातील दैनंदिन सातत्यही कौशल्यवाढीस लाभदायक ठरते, असे निखिल कानेटकर यांनी सांगितले़