शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

वाळूजला भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:54 IST

वाळूज महानगर : वाळूज गावातील नवीन वसाहतीमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

वाळूज महानगर : वाळूज गावातील नवीन वसाहतीमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी कुणालाही जुमानत नसल्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाणीपुरवठ्याची तक्रार करणाऱ्या तक्रारदारास सरपंच टँकरचे पोकळ आश्वासन देऊन बोळवण करीत असल्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.वाळूज गावात चार महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. गावातील पाणीपुरवठ्याचे कुठलेही वेळापत्रक नसल्यामुळे महिला व नागरिकांना नळाला पाणी येण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. सद्यस्थितीत शिवाजीनगर, दत्त कॉलनी, श्रद्धा कॉलनी, श्रीराम कॉलनी इ. वसाहतींमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सतत तक्रारी करूनही नागरिकांची दिशाभूल करून वीजपुरवठा बंद होता, पाईपलाईन फुटली इ. कारणे दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यही फारसे स्वारस्य दाखवीत नाहीत. सध्या गावात पाच टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ग्रामपंचायतीच्या वतीने जवळपास ५ लाख रुपये खर्च करून विहीर दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. पुरेसे पाणी असतानाही केवळ कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराया विषयी ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे म्हणाले की, गावातील अनेक भागांत पंधरा-पंधरा दिवस पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणारे कर्मचारी कामचुकारपणा करीत असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आदेशही पाळत नसल्यामुळे या दोषी कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे. पाणीपुरवठ्या संदर्भात तक्रारी आल्यास संबधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.