शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजला भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:54 IST

वाळूज महानगर : वाळूज गावातील नवीन वसाहतीमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

वाळूज महानगर : वाळूज गावातील नवीन वसाहतीमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी कुणालाही जुमानत नसल्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाणीपुरवठ्याची तक्रार करणाऱ्या तक्रारदारास सरपंच टँकरचे पोकळ आश्वासन देऊन बोळवण करीत असल्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.वाळूज गावात चार महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. गावातील पाणीपुरवठ्याचे कुठलेही वेळापत्रक नसल्यामुळे महिला व नागरिकांना नळाला पाणी येण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. सद्यस्थितीत शिवाजीनगर, दत्त कॉलनी, श्रद्धा कॉलनी, श्रीराम कॉलनी इ. वसाहतींमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सतत तक्रारी करूनही नागरिकांची दिशाभूल करून वीजपुरवठा बंद होता, पाईपलाईन फुटली इ. कारणे दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यही फारसे स्वारस्य दाखवीत नाहीत. सध्या गावात पाच टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ग्रामपंचायतीच्या वतीने जवळपास ५ लाख रुपये खर्च करून विहीर दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. पुरेसे पाणी असतानाही केवळ कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराया विषयी ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे म्हणाले की, गावातील अनेक भागांत पंधरा-पंधरा दिवस पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणारे कर्मचारी कामचुकारपणा करीत असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आदेशही पाळत नसल्यामुळे या दोषी कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे. पाणीपुरवठ्या संदर्भात तक्रारी आल्यास संबधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.