शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

सांडपाणी थेट घरांमध्ये; सुरक्षितताही धोक्यात

By admin | Updated: June 23, 2016 01:16 IST

बीड : इतरांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र न पाहता डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची सुरक्षा पुरती धोक्यात आली आहे.

बीड : इतरांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र न पाहता डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची सुरक्षा पुरती धोक्यात आली आहे. कायद्याचे रक्षणकर्तेच मूलभूत सोयी- सुविधांना पारखे आहेत. पोलीस वसाहतींना समस्यांनी घेरले असून सांडपाणी घरांमध्ये शिरत असल्याने कुटुंबे मेटाकुटीला आली आहेत. तुटलेल्या दरवाजे व भिंतींना पडलेल्या भेगांमुळे सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.शहरात तीन ठिकाणी पोलीस वसाहती आहेत. अधीक्षक कार्यालयामागे, बशीरगंज भागात तसेच बालेपीर भागातील वसाहतींचा यात समावेश आहे. बुधवारी ‘लोकमत’ने पोलीस अधीक्षक कार्यालयास चिकटून असलेल्या वसाहतीचा आढावा घेतला. निजामकाळात वसलेल्या या वसाहतीला आता जुनी पोलीस कॉलनी या नावाने ओळखले जाते. या वसाहतीत ५० कुटुंबे राहतील एवढी घरे आहेत. वसाहतीत पाऊल ठेवताच उग्र वास येतो. डुकरांचा मुक्त संचार व सुबाभळींचा विळखा आहे. नाल्यांची एवढी दुरवस्था झाली आहे की, सांडपाण्याचे अक्षरश: गटार झाले आहे. नाल्यातील पाणी वाहून जात नसल्याने ते तुंबते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याची भर पडल्यास सांडपाणी घरांमध्ये शिरते. रस्ते व घराचा उंबरठा बरोबरीत असून पावसानंतर तळ्याचे स्वरुप येते. अंगणातील पाणी घरात शिरल्याने हाल होतात, असे पोलीस पत्नीने सांगितले.वसाहतीत पाण्याची समस्या अतिशय गंभीर असून एक हातपंप होता;परंतु तो अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. पालिकेचे टँकर येते; परंतु आठ दिवसाला. राहायलाच जागा पुरत नाही, त्यामुळे पाणी साठवून ठेवणेही शक्य होत नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयातील कुपनलिकेतून नळजोडणी घेतलेली आहे. ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने धुणी, भांडी करण्यासाठी वापरले जाते. बहुतांश कुटुंबांना विकतचे पाणी घ्यावे लागते. (प्रतिनिधी)