शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: March 26, 2016 00:57 IST

औरंगाबाद : ग्रामीण भागात थेंब-थेंब पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. शहरातील चित्रही फारसे वेगळे नाही.

औरंगाबाद : ग्रामीण भागात थेंब-थेंब पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. शहरातील चित्रही फारसे वेगळे नाही. येथील एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठाही आता मनपाने बंद करून तीन दिवसांआड केला आहे. शिवाय वाहने धुणाऱ्यांनाही मनपाने आता दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत; पण दुसऱ्यांना शहाणपणा शिकविणाऱ्या महापालिकेनेच पाणी नासाडीबाबत निष्काळजीपणाचा कळस गाठला आहे. मागील ६ महिन्यांत औरंगपुरा भाजीमंडईतील हजारो लिटर पाणी दररोज नाल्यात सोडण्यात येत असून या पाण्याचे योग्य नियोजन केले असते तर शहरातील बागा व उद्योगांना हे पाणी वापरता आले असते.औरंगपुऱ्यातील जुन्या भाजीमंडईत महानगरपालिकेने व्यापार संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. येथे वर्षभरापासून पायाभरणीसाठी खोदण्याचे काम सुरू आहे. ३० फुटांपेक्षा अधिक खोल खोदले असता पाणी लागले. दुष्काळाची परिस्थिती असताना येथील मोठा खड्डा पाण्याने भरलेला दिसून येत आहे. येथील पाणी काढण्यासाठी मनपाने चार मोटारी बसविल्या आहेत. ६ महिन्यांपासून २४ तास पाणी उपसा केला जात आहे. या पाण्याचा योग्य वापर करण्याऐवजी मनपा प्रशासनाने हे पाणी थेट नाल्यात टाकण्यास सुरुवात केली. दररोज हजारो लिटर पाणी नाल्यात सोडण्यात येत आहे. असे म्हटले जाते की, या ठिकाणी खाली नहर आहे. सतत मोटार सुरू असल्यास येथे स्वच्छ पाणी येते. रस्त्यावरील भाजी व फळविक्रेता सांडपाणी म्हणून या पाण्याचा वापर करीत आहेत. जुन्या काळी सायफन पद्धतीने येथून पाणी शहरात फिरविले जात होते. ऐतिहासिक नहर फोडण्याचे काम महानगरपालिकेने केल्याचा आरोप होत आहे. औरंगपुऱ्यातील रहिवासी अप्पा कुलकर्णी यांनी सांगितले की, मनपाने लाखो लिटर पाणी नाल्यात सोडले आहे. या पाण्याचा वापर उद्यानासाठी करण्यात आला असता. भाजी विक्रेत्या मीराबाई गायके म्हणाल्या की, ड्रेनेजलाईनद्वारे येथील स्वच्छ पाणी नाल्यात सोडण्यात येत आहे. सचिन गायकवाड या फळ विक्रेत्याने सांगितले की, एवढे पाणी वाया जात असताना अजूनही महानगरपालिका प्रशासन झोपेत असून येथील पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठीही विचार होताना दिसत नाही. दररोज हजारो लिटर पाणी नाल्यात जात असून आता महानगरपालिकेला कोण दंड करणार, असा प्रश्न शहरवासी विचारत आहेत.