शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: March 26, 2016 00:57 IST

औरंगाबाद : ग्रामीण भागात थेंब-थेंब पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. शहरातील चित्रही फारसे वेगळे नाही.

औरंगाबाद : ग्रामीण भागात थेंब-थेंब पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. शहरातील चित्रही फारसे वेगळे नाही. येथील एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठाही आता मनपाने बंद करून तीन दिवसांआड केला आहे. शिवाय वाहने धुणाऱ्यांनाही मनपाने आता दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत; पण दुसऱ्यांना शहाणपणा शिकविणाऱ्या महापालिकेनेच पाणी नासाडीबाबत निष्काळजीपणाचा कळस गाठला आहे. मागील ६ महिन्यांत औरंगपुरा भाजीमंडईतील हजारो लिटर पाणी दररोज नाल्यात सोडण्यात येत असून या पाण्याचे योग्य नियोजन केले असते तर शहरातील बागा व उद्योगांना हे पाणी वापरता आले असते.औरंगपुऱ्यातील जुन्या भाजीमंडईत महानगरपालिकेने व्यापार संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. येथे वर्षभरापासून पायाभरणीसाठी खोदण्याचे काम सुरू आहे. ३० फुटांपेक्षा अधिक खोल खोदले असता पाणी लागले. दुष्काळाची परिस्थिती असताना येथील मोठा खड्डा पाण्याने भरलेला दिसून येत आहे. येथील पाणी काढण्यासाठी मनपाने चार मोटारी बसविल्या आहेत. ६ महिन्यांपासून २४ तास पाणी उपसा केला जात आहे. या पाण्याचा योग्य वापर करण्याऐवजी मनपा प्रशासनाने हे पाणी थेट नाल्यात टाकण्यास सुरुवात केली. दररोज हजारो लिटर पाणी नाल्यात सोडण्यात येत आहे. असे म्हटले जाते की, या ठिकाणी खाली नहर आहे. सतत मोटार सुरू असल्यास येथे स्वच्छ पाणी येते. रस्त्यावरील भाजी व फळविक्रेता सांडपाणी म्हणून या पाण्याचा वापर करीत आहेत. जुन्या काळी सायफन पद्धतीने येथून पाणी शहरात फिरविले जात होते. ऐतिहासिक नहर फोडण्याचे काम महानगरपालिकेने केल्याचा आरोप होत आहे. औरंगपुऱ्यातील रहिवासी अप्पा कुलकर्णी यांनी सांगितले की, मनपाने लाखो लिटर पाणी नाल्यात सोडले आहे. या पाण्याचा वापर उद्यानासाठी करण्यात आला असता. भाजी विक्रेत्या मीराबाई गायके म्हणाल्या की, ड्रेनेजलाईनद्वारे येथील स्वच्छ पाणी नाल्यात सोडण्यात येत आहे. सचिन गायकवाड या फळ विक्रेत्याने सांगितले की, एवढे पाणी वाया जात असताना अजूनही महानगरपालिका प्रशासन झोपेत असून येथील पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठीही विचार होताना दिसत नाही. दररोज हजारो लिटर पाणी नाल्यात जात असून आता महानगरपालिकेला कोण दंड करणार, असा प्रश्न शहरवासी विचारत आहेत.