शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पेरणीचे २ हजार कोटी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:30 IST

विभागातील आठ जिल्ह्यांंत खरीप पेरणीत अंदाजे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली असून, ती जवळजवळ वाया गेल्यात जमा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना केल्यानंतर २०१६ मध्ये वरुणराजाने मराठवाड्याला थोडा दिलासा दिला; परंतु यंदा पुन्हा कमी पाऊस झाल्यामुळे मराठवाडा मेटाकुटीला आला आहे. शेतकºयांनी जून महिन्यात केलेली खरिपाची पेरणी पावसाने दडी मारल्यामुळे संपुष्टात आली आहे. विभागातील आठ जिल्ह्यांंत खरीप पेरणीत अंदाजे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली असून, ती जवळजवळ वाया गेल्यात जमा झाली आहे.२०१५ साली केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्तालयाकडून विभागातील टंचाईचा आढावा घेतला होता. यंदा मात्र केंद्र आणि राज्याचे कुठलेही पथक मराठवाड्याच्या पाहणीसाठी येण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कृत्रिम पावसाची यंत्रणाही नुकतीच हलविण्यात आली.खरीप हंगाम पावसाअभावी हातून जाणार असल्यामुळे शेतकरी पुरता हताश झाला आहे. पाऊसच नसल्यामुळे दुबार पेरणीदेखील आता होणे शक्य नाही. खरीप व रबी मिळून ६२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५४ लाख हेक्टरवर सरासरी पेरणी होते. मराठवाड्यात एकूण ४९ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी अंदाजे ४४ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. नांगरणी, पेरणी, खतांसाठी एकरी केलेल्या १० ते १२ हजार रुपयांच्या खर्चासह मजुरी आणि इतर खर्चाचा आकडा विचारात घेतला, तर विभागात खरीप पेरणीवर २ हजार कोटींहून अधिक झालेली गुंतवणूक मातीत गेली आहे. यापुढे पाऊस झाला तरी, त्यातून खरीप पीके तगण्याची चिन्हे नाहीत. परंतु पिण्यासाठी पाणी आणि फळ बागायत त्यातून जगू शकते. त्यामुळे सर्वाचे डोळे वर लागले आहेत.