शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
4
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
5
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
6
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
7
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
8
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
9
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
10
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
11
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
12
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
13
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
14
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
15
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
16
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
17
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
18
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
19
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
20
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

खरीप पेरणीचे २ हजार कोटी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:30 IST

विभागातील आठ जिल्ह्यांंत खरीप पेरणीत अंदाजे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली असून, ती जवळजवळ वाया गेल्यात जमा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना केल्यानंतर २०१६ मध्ये वरुणराजाने मराठवाड्याला थोडा दिलासा दिला; परंतु यंदा पुन्हा कमी पाऊस झाल्यामुळे मराठवाडा मेटाकुटीला आला आहे. शेतकºयांनी जून महिन्यात केलेली खरिपाची पेरणी पावसाने दडी मारल्यामुळे संपुष्टात आली आहे. विभागातील आठ जिल्ह्यांंत खरीप पेरणीत अंदाजे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली असून, ती जवळजवळ वाया गेल्यात जमा झाली आहे.२०१५ साली केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्तालयाकडून विभागातील टंचाईचा आढावा घेतला होता. यंदा मात्र केंद्र आणि राज्याचे कुठलेही पथक मराठवाड्याच्या पाहणीसाठी येण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कृत्रिम पावसाची यंत्रणाही नुकतीच हलविण्यात आली.खरीप हंगाम पावसाअभावी हातून जाणार असल्यामुळे शेतकरी पुरता हताश झाला आहे. पाऊसच नसल्यामुळे दुबार पेरणीदेखील आता होणे शक्य नाही. खरीप व रबी मिळून ६२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५४ लाख हेक्टरवर सरासरी पेरणी होते. मराठवाड्यात एकूण ४९ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी अंदाजे ४४ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. नांगरणी, पेरणी, खतांसाठी एकरी केलेल्या १० ते १२ हजार रुपयांच्या खर्चासह मजुरी आणि इतर खर्चाचा आकडा विचारात घेतला, तर विभागात खरीप पेरणीवर २ हजार कोटींहून अधिक झालेली गुंतवणूक मातीत गेली आहे. यापुढे पाऊस झाला तरी, त्यातून खरीप पीके तगण्याची चिन्हे नाहीत. परंतु पिण्यासाठी पाणी आणि फळ बागायत त्यातून जगू शकते. त्यामुळे सर्वाचे डोळे वर लागले आहेत.