शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवाशांमध्ये झाली यंदा दुपटीने वाढ

By admin | Updated: December 14, 2015 23:58 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत दुपटीने वाढ झाली आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत दुपटीने वाढ झाली आहे. २०१०-११ मध्ये २ लाखांवर प्रवाशांनी विमान प्रवास केला, तर २०१४-१५ मध्ये तब्बल ४ लाखांवर प्रवाशांनी हवाई सफर केली. चिकलठाणा विमानतळावरून सध्या औरंगाबाद ते दिल्ली, औरंगाबाद ते मुंबई, औरंगाबाद ते हैदराबाद-तिरुपती आणि हैदराबाद येथून चेन्नई व बंगळुरू अशा हवाई कनेक्टिव्हिटीद्वारे विमानसेवा सुरू आहे. वेरूळ आणि अजिंठा लेणी, शहरातील पर्यटनस्थळे, औद्योगिक क्षेत्र, उद्योगांचा विकास यामुळे विमान प्रवाशांमध्ये वाढ होत आहे. शिवाय चिकलठाणा विमानतळावरून हज यात्रेकरूंसाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आहे. दरवर्षी ४ हजारांवर हज यात्रेकरू या विमानसेवेचा लाभ घेत आहेत. स्पाईस जेटच्या विमानसेवेने प्रवासी संख्या वाढीस हातभार लावला; परंतु स्पाईस जेटने २०१५ च्या सुरुवातीला विमानसेवा बंद के ली. त्यानंतर जुलै महिन्यापासून ट्रुजेटने तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू केली. तसेच बंगळुरू, चेन्नईसाठीही कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली. विमानतळाचे भव्य टर्मिनल, विमान कंपन्यांची सेवा आणि औरंगाबादचा झालेला मोठा विकास यामुळे विमान प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे, असे विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले.खाजगी विमानांचेही उड्डाणचिकलठाणा विमानतळावर खाजगी विमानांचीही ये-जा होते. शिवाय वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी विमानतळावरून उड्डाणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, अशा परिस्थितीत चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाने प्रशिक्षण देणाऱ्या विमानांचे उड्डाण वाढविण्यासाठीही पुढाकार घेतला. प्रशिक्षण देणाऱ्या विमानांचेही गेल्या काही दिवसांपासून विमानतळावरून उड्डाण होत आहे.