शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

लाट उष्णतेची...!

By admin | Updated: May 18, 2016 00:17 IST

औरंगाबाद : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या सूचनांनुसार १७ ते २१ मे या कालावधीत औरंगाबादसह विभागात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या सूचनांनुसार १७ ते २१ मे या कालावधीत औरंगाबादसह विभागात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. मंगळवारी लाटेच्या पहिल्या दिवशीच कडक ऊन पडल्यामुळे शहरात दुपारच्या वेळी कमी वर्दळ असल्याचे दिसून आले. सूर्य सरळ रेषेत आल्याने नागरिकांचे उष्णतेमुळे हाल होत आहेत. उष्णतेची लाट येण्याची शक्यता विभागीय आणि जिल्हा प्रशासनाने हवामान खात्याच्या, महसूल व वन विभागाच्या परिपत्रकावरून वर्तविली आहे. नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात फिरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दोन दिवसांपासून मराठवाड्यात ४२ अंश सेल्शिअसपर्यंत पारा चढतो आहे. १७ ते २१ मेदरम्यान तापमान यापुढे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉही, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी केले आहे. उष्णतेमुळे तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, हॅट, बूट, चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. जर कुणी बाहेर उन्हात काम करीत असेल, तर हॅट किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या (पान २ वर)तापमान ४२.२ अंशावर; किमान तापमानातही वाढहवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार औरंगाबादेत उष्णतेची लाट येऊन धडकली आहे. सूर्याने प्रखरतेने आग ओकणे सुरू केले आहे. त्यामुळे मंगळवारी शहराचे कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. किमान तापमानातही मोठी वाढ नोंदली गेली. हवेतील कोरडेपणामुळे दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा बसत होत्या. शहराच्या दैनंदिन व्यवहारावरही त्याचा परिणाम दिसून आला.सध्या सूर्य पृथ्वीच्या मध्यावर म्हणजेच विषुववृत्तावर येत आहे. म्हणून पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे. याच कारणामुळे शहरातील उन्हाचा पारा वाढला आहे. सकाळपासूनच सूर्यकिरणांची प्रखरता जाणवत होती.सकाळी ११ वाजेनंतर उन्हाचा कडाका खूपच वाढला. वातावरणातील आर्द्रताही कमी झाली होती. त्यामुळे उष्ण वारे वाहत होते. त्यामुळे बहुतेक नागरिकांनी उन्हात बाहेर पडणे टाळले. परिणामी, दुपारच्या वेळी शहरातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसत होते. प्रमुख रस्त्यांवरील वाहतूकही रोडावली होती. बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. जे काही थोडे लोक बाहेर फिरत होते त्यांनीही उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, रुमाल, टोपी घातलेली दिसत होती. तापमान वाढल्यामुळे अनेक ठिकाणी दुपारच्या वेळी रस्त्यावरील डांबर वितळले. औरंगपुरा, पैठणगेट, गुलमंडी, निराला बाजार, कॅनॉट गार्डन, टीव्ही सेंटर, एमटू, पुंडलिकनगर रोड आदी भागांतील बाजारपेठाही ग्राहकांच्या प्रतीक्षेत होत्या. उन्हाचा हा कडाका सायंकाळी ५ वाजेपर्यंत कायम होता. चिकलठाणा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी शहराचे कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, तर किमान तापमानही ३० अंशांच्या पुढे गेले. मंगळवारी किमान तापमान ३०.१ अंश इतके नोंदले गेले. उष्णतेची ही लाट येत्या तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.