शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लाट उष्णतेची...!

By admin | Updated: May 18, 2016 00:17 IST

औरंगाबाद : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या सूचनांनुसार १७ ते २१ मे या कालावधीत औरंगाबादसह विभागात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या सूचनांनुसार १७ ते २१ मे या कालावधीत औरंगाबादसह विभागात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. मंगळवारी लाटेच्या पहिल्या दिवशीच कडक ऊन पडल्यामुळे शहरात दुपारच्या वेळी कमी वर्दळ असल्याचे दिसून आले. सूर्य सरळ रेषेत आल्याने नागरिकांचे उष्णतेमुळे हाल होत आहेत. उष्णतेची लाट येण्याची शक्यता विभागीय आणि जिल्हा प्रशासनाने हवामान खात्याच्या, महसूल व वन विभागाच्या परिपत्रकावरून वर्तविली आहे. नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात फिरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दोन दिवसांपासून मराठवाड्यात ४२ अंश सेल्शिअसपर्यंत पारा चढतो आहे. १७ ते २१ मेदरम्यान तापमान यापुढे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉही, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी केले आहे. उष्णतेमुळे तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, हॅट, बूट, चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. जर कुणी बाहेर उन्हात काम करीत असेल, तर हॅट किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या (पान २ वर)तापमान ४२.२ अंशावर; किमान तापमानातही वाढहवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार औरंगाबादेत उष्णतेची लाट येऊन धडकली आहे. सूर्याने प्रखरतेने आग ओकणे सुरू केले आहे. त्यामुळे मंगळवारी शहराचे कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. किमान तापमानातही मोठी वाढ नोंदली गेली. हवेतील कोरडेपणामुळे दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा बसत होत्या. शहराच्या दैनंदिन व्यवहारावरही त्याचा परिणाम दिसून आला.सध्या सूर्य पृथ्वीच्या मध्यावर म्हणजेच विषुववृत्तावर येत आहे. म्हणून पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे. याच कारणामुळे शहरातील उन्हाचा पारा वाढला आहे. सकाळपासूनच सूर्यकिरणांची प्रखरता जाणवत होती.सकाळी ११ वाजेनंतर उन्हाचा कडाका खूपच वाढला. वातावरणातील आर्द्रताही कमी झाली होती. त्यामुळे उष्ण वारे वाहत होते. त्यामुळे बहुतेक नागरिकांनी उन्हात बाहेर पडणे टाळले. परिणामी, दुपारच्या वेळी शहरातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसत होते. प्रमुख रस्त्यांवरील वाहतूकही रोडावली होती. बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. जे काही थोडे लोक बाहेर फिरत होते त्यांनीही उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, रुमाल, टोपी घातलेली दिसत होती. तापमान वाढल्यामुळे अनेक ठिकाणी दुपारच्या वेळी रस्त्यावरील डांबर वितळले. औरंगपुरा, पैठणगेट, गुलमंडी, निराला बाजार, कॅनॉट गार्डन, टीव्ही सेंटर, एमटू, पुंडलिकनगर रोड आदी भागांतील बाजारपेठाही ग्राहकांच्या प्रतीक्षेत होत्या. उन्हाचा हा कडाका सायंकाळी ५ वाजेपर्यंत कायम होता. चिकलठाणा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी शहराचे कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, तर किमान तापमानही ३० अंशांच्या पुढे गेले. मंगळवारी किमान तापमान ३०.१ अंश इतके नोंदले गेले. उष्णतेची ही लाट येत्या तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.