शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

वारकरी सांप्रदाय आधुनिकतेशी नाळ जोडण्यात कमी पडला : नामदेवशास्त्री

By admin | Updated: April 9, 2015 00:15 IST

प्रताप नलावडे , बीड बदलत्या काळानुसार वारकरी सांप्रदाय बदलला नाही. आधुनिकतेशी नाळ जोडण्यात कमी पडल्यामुळे नव्या पिढीला घडविताना त्यांच्यावर संस्कार करण्यात

प्रताप नलावडे , बीडबदलत्या काळानुसार वारकरी सांप्रदाय बदलला नाही. आधुनिकतेशी नाळ जोडण्यात कमी पडल्यामुळे नव्या पिढीला घडविताना त्यांच्यावर संस्कार करण्यात हा सांप्रदाय कमी पडला असे सांगतानाच भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी ज्या कीर्तनकारांनी स्वत:ला आधुनिकतेसोबत जोडले, ते संस्कार देण्याचे काम तळमळीने करत असल्याचे आवर्जून सांगितले. नारळी सप्ताहाच्या निमित्ताने ते लोकमतशी बोलत होते.समाजात काही अमुलाग्र बदल करायचे असतील तर त्यासाठी वारकरी सांप्रदायाचे माध्यम खूप प्रभावी असल्याचे सांगत नामदेव महाराज म्हणाले, संसार हा सुखाचा होत नाही, असे अगदी स्पष्टपणे सांगणारा हा सांप्रदाय आहे. आमच्याकडे येणारा प्रत्येकजण हा निरपेक्ष भावनेने येत असतो. त्याला काही अपेक्षा नसते. आजच्या कीर्तनकारात काहीजणांनी आधुनिकतेचा स्वीकार केला आहे, परंतु जे जुने कीर्तनकार आहेत, ते हा बदल स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे तरूण पिढीशी त्यांचा संवाद प्रभावी होताना दिसत नाही. कीर्तन हे समाजप्रबोधनाचे खूप प्रभावी माध्यम आहे. आज तंत्रज्ञानात कितीही बदल झाला असला तरी त्याचा कीर्तनावर परिणाम झालेला नाही. म्हणूनच हिंगणी सारख्या छोट्याशा गावात जेव्हा नारळी सप्ताहाचे आयोजन होते, तेव्हा लाखाच्या घरात लोक आजही कीर्तनासाठी आवर्जून येतात.संत भगवान बाबांनी सुरू केलेली ही नारळी सप्ताहाची परंपरा विशद करताना नामदेव महाराज म्हणाले, ८२ वर्षापूर्वी सप्ताहाची कल्पना बाबांनीच प्रत्यक्षात उतरविली. या सप्ताहाला राज्यभरातून भाविक येतात. एका छोट्याशा गावात संपूर्ण राज्याचे प्रतिबिंब उमटताना पाहिले की या सप्ताहाची उंची आपल्या लक्षात येते. समाजप्रबोधनासाठी सुरू केलेली ही सप्ताहाची परंपरा आजही तशीच सुरू आहे. केवळ कीर्तन आणि भजन इतकेच या सप्ताहाचे स्वरूप नाही तर समाजिक बांधिलकीही जपली जाते. सामाजिक ऐक्याचा काला !हिंगणी खुर्द या गावात गुरूवारी सप्ताहाची समाप्ती होत आहे. यावेळी होणारा काला हा खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्याचा काला म्हणावा लागेल. लोक सप्ताहाची सुरूवात झाल्यापासून जमेल तशी मदत करत आहेत. आजुबाजुच्या गावातून टेंम्पो भरून भाकरी येतात. या सप्ताहात कोणता धर्म नाही आणि कोणती जात नाही. भेदाभेदच्या पलिकडचे हे सगळे आहे. भगवान गडावर आजवर काहीजणांनी जाणीवर्पूक जातीयतेचे आरोप केले. परंतु भगवान गडाने कधी जात पात पाहिली नाही. समाजासाठी निरंतर काम करत राहणे इतकेच काय ते आम्हाला माहिती आहे, असेही डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले. भगवान गडावर आजही १०० विद्यार्थी प्राचीन अध्यात्माचे शिक्षण घेत असून याचवेळी ते प्रचलित महाविद्यालयीन शिक्षणही घेत असल्याचे ते आवर्जून म्हणाले.भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाहीभगवानगडावर सर्वसामान्य भाविकांपासून ते राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी हजेरी लावत असतात. मात्र, ते सर्वजण भक्त म्हणून येतात. भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाही, असे सांगून नामदेवशास्त्री म्हणाले, आईला सर्व लेकरं समान असतात. गड कोणा एकाचा नाही तर सर्वसामान्य भाविकांचा आहे.