शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

गोदामपालही वाटेकरी

By admin | Updated: August 10, 2014 23:51 IST

विजय चोरडिया जिंतूर येथील शासकीय गोदामातील अनागोंदी कारभारात प्रशासनाबरोबरच गोदाम रक्षकही वाटेकरी आहे

विजय चोरडिया जिंतूरयेथील शासकीय गोदामातील अनागोंदी कारभारात प्रशासनाबरोबरच गोदाम रक्षकही वाटेकरी आहे. दलालाच्या मदतीने क्विंटल मागे दोन किलोच्या फरकाने लाखो रुपयांची कमाई गोदाम रक्षक करीत आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या धान्याची काळ्याबाजारात विल्हेवाट लावण्यास एक प्रकारे मदतच होत आहे.जिंतूर येथील शासकीय गोदामात होणाऱ्या धान्य घोटाळ्याकडे प्रशासनाने फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मागील पाच वर्षांपासून गोदामातील धान्य काळ्या बाजारात नेणारे रॅकेट कार्यरत आहे. या संदर्भात वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करुनही त्यातून फारसे तथ्य बाहेर आले नाही. शासकीय गोदामात विविध योजनांचा माल आल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशिष्ट वाहनांचा वापर करण्यात येतो. पुरवठा विभागातून परमीट घेण्यापासून ते गोदामातून माल उचलेपर्यंत दलालांची साखळी कार्यरत आहे. दुकानांचे परमीट दलालच हाती घेऊन एकाच वेळी गोदाम रक्षकाकडे परमीट दिले जाते. त्यानंतर पाहिजे त्या वाहनातून माल भरुन पुंगळा, लिंबाळा या भागात धान्याची इतर पोत्यात पलटी करुन हैदराबादकडे माल पाठविला जातो. ही प्रक्रिया करीत असताना दलालांना कशाचीही भिती वाटत नाही. कारण पुरवठा विभाग व पोलिसांना रसद पुरविल्या जात असल्याने तक्रारीकडेही प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे राजरोसपणे धान्याचा काळा बाजार करणाऱ्या साखळीला खतपाणी मिळत असल्याचे दिसते.विविध योजनेचे दरमाह ५ हजार क्विंटल धान्य गोदामात येते. त्यातून केवळ ४० ते ५० टक्के धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचते. दरमाह तब्बल अडीच ते तीन हजार क्विंटलचा काळा बाजार केला जातो. दलाल व दुकानदारांचे चांगभलेअन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अडीच हजार क्विंटल धान्य गोदामातून काळ्या बाजारात गेले. गहू दोन रुपये किलो दराने १२०० क्विंटल ज्याची किंमत २ लाख ४० हजार रुपये होते. तर तांदुळ १३०० क्विंटल ज्याची किंमत ३ रुपये प्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये होते. हा दोन्ही माल सहा लाख ३० हजार रुपयांचा असताना दुकानदारांना गहू प्रति किलो ९ रुपये दराने तर तांदुळ ८ रुपये दराने दलाल मोबदला देत असल्याने ६ लाख ३० हजारांचे धान्य दुकानदाराकडून दलाल २१ लाख २० हजार रुपयांना खरेदी करतात. हेच धान्य हे दलाल गहू १४ रुपये किलो दराने व तांदुळ १२ रुपये किलोने हैदराबाद येथे विक्री करतात. यातून ३२ लाख ४० हजार रुपयांची उलाढाल होत असून केवळ अडीच हजार क्विंटलमध्ये ११ लाख २० हजार रुपये दलालांच्या खिशात जात आहेत. तर १४ लाख ९० हजार रुपये दुकानदारांच्या खिशात जात आहेत.