शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

गोदामपालही वाटेकरी

By admin | Updated: August 10, 2014 23:51 IST

विजय चोरडिया जिंतूर येथील शासकीय गोदामातील अनागोंदी कारभारात प्रशासनाबरोबरच गोदाम रक्षकही वाटेकरी आहे

विजय चोरडिया जिंतूरयेथील शासकीय गोदामातील अनागोंदी कारभारात प्रशासनाबरोबरच गोदाम रक्षकही वाटेकरी आहे. दलालाच्या मदतीने क्विंटल मागे दोन किलोच्या फरकाने लाखो रुपयांची कमाई गोदाम रक्षक करीत आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या धान्याची काळ्याबाजारात विल्हेवाट लावण्यास एक प्रकारे मदतच होत आहे.जिंतूर येथील शासकीय गोदामात होणाऱ्या धान्य घोटाळ्याकडे प्रशासनाने फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मागील पाच वर्षांपासून गोदामातील धान्य काळ्या बाजारात नेणारे रॅकेट कार्यरत आहे. या संदर्भात वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करुनही त्यातून फारसे तथ्य बाहेर आले नाही. शासकीय गोदामात विविध योजनांचा माल आल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशिष्ट वाहनांचा वापर करण्यात येतो. पुरवठा विभागातून परमीट घेण्यापासून ते गोदामातून माल उचलेपर्यंत दलालांची साखळी कार्यरत आहे. दुकानांचे परमीट दलालच हाती घेऊन एकाच वेळी गोदाम रक्षकाकडे परमीट दिले जाते. त्यानंतर पाहिजे त्या वाहनातून माल भरुन पुंगळा, लिंबाळा या भागात धान्याची इतर पोत्यात पलटी करुन हैदराबादकडे माल पाठविला जातो. ही प्रक्रिया करीत असताना दलालांना कशाचीही भिती वाटत नाही. कारण पुरवठा विभाग व पोलिसांना रसद पुरविल्या जात असल्याने तक्रारीकडेही प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे राजरोसपणे धान्याचा काळा बाजार करणाऱ्या साखळीला खतपाणी मिळत असल्याचे दिसते.विविध योजनेचे दरमाह ५ हजार क्विंटल धान्य गोदामात येते. त्यातून केवळ ४० ते ५० टक्के धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचते. दरमाह तब्बल अडीच ते तीन हजार क्विंटलचा काळा बाजार केला जातो. दलाल व दुकानदारांचे चांगभलेअन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अडीच हजार क्विंटल धान्य गोदामातून काळ्या बाजारात गेले. गहू दोन रुपये किलो दराने १२०० क्विंटल ज्याची किंमत २ लाख ४० हजार रुपये होते. तर तांदुळ १३०० क्विंटल ज्याची किंमत ३ रुपये प्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये होते. हा दोन्ही माल सहा लाख ३० हजार रुपयांचा असताना दुकानदारांना गहू प्रति किलो ९ रुपये दराने तर तांदुळ ८ रुपये दराने दलाल मोबदला देत असल्याने ६ लाख ३० हजारांचे धान्य दुकानदाराकडून दलाल २१ लाख २० हजार रुपयांना खरेदी करतात. हेच धान्य हे दलाल गहू १४ रुपये किलो दराने व तांदुळ १२ रुपये किलोने हैदराबाद येथे विक्री करतात. यातून ३२ लाख ४० हजार रुपयांची उलाढाल होत असून केवळ अडीच हजार क्विंटलमध्ये ११ लाख २० हजार रुपये दलालांच्या खिशात जात आहेत. तर १४ लाख ९० हजार रुपये दुकानदारांच्या खिशात जात आहेत.