शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

युद्ध किंवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ‘युद्ध किंवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे. असा समज असलेले समीकरण बाजूला सारण्याची गरज आहे. मी स्वतः १९७१ ...

औरंगाबाद : ‘युद्ध किंवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे. असा समज असलेले समीकरण बाजूला सारण्याची गरज आहे. मी स्वतः १९७१ च्या युद्धात चीनच्या सीमेवर तोफखान्याचा प्रमुख म्हणून काम पाहिले. आज माझ्यासारखे सैनिक तुमच्यासमोर उभे आहेत. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनी मनामध्ये शंका न बाळगता भारतीय सेनेत सामील व्हावे. ती देशसेवा म्हणजे सर्वोच्च मान मी समजतो,’ असे मत कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी व्यक्त केले.

कारगिल विजय दिनानिमित्त गारखेड्यातील कारगिल स्मृतिवनात आयोजित अभिवादनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षीय भाषणात आ. अतुल सावे म्हणाले, कारगिल युद्धात आहुती देणाऱ्या ५२७ जवानांना आणि देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सर्व जवानांमुळे आज आपण इथे सुरक्षित आहोत. त्यांच्या स्मरणार्थ औरंगाबाद येथे स्मृतिवन उभारण्यात आले आहे. सर्वांच्या पुढाकाराने स्मृतिवनाचे रूपांतर स्मारकात व्हायला हवे. कारगिल स्मृतिवन समितीचे पंकज भारसाखळे यांनी प्रस्तावना केली. यावेळी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘जय जवान, जय किसान’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाची सांगता ‘कारगिल शहीद जवान, अमर रहे अमर रहे’ या घोषणेने झाली.

यावेळी कारगिल स्मृतिवन समितीचे निवृत्त पोलीस अधीक्षक वैजनाथ केंद्रे, गंगाधर शेवाळे, अर्जुन गवारे, अप्पा हुळमजगे, डॉ. उदय डोंगरे, भिकन आंबे, प्राचार्य संध्या काळकर, प्राचार्य सपकाळ, प्राचार्य प्रकाश नागरे, राजाराम मोरे, प्रा. गोविंद केंद्रे, कैलास वाहुळे, जसवंतसिंह राजपूत, भास्कर दवंडे, माजी सैनिक संघटनेचे सुभेदार मेजर काशीनाथ पवार, अप्पाजी फुलम्हस्के, पोपटराव नारायण, गजानन पिंपळे, कपिल राऊत, साहेबराव शिंदे, गोपीनाथ कोल्हे, सुदाम साळुंके, रामेश्वर टेहरे, उमाकांत रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत बिऱ्हाडे यांनी केले. जगदीश चव्हाण यांनी आभार मानले.

फोटो ओळ : कारगिल विजय दिनानिमित्त गारखेड्यातील कारगिल स्मृतिवन उद्यानात ‘अमर जवान स्तंभाला’ अभिवादन करताना कॅप्टन सुरेंद्र सुर्वे, आ. अतुल सावे, पंकज भारसाखळे यांच्यासह माजी सैनिक व परिसरातील नागरिक दिसत आहेत.