शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

युद्ध किंवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ‘युद्ध किंवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे. असा समज असलेले समीकरण बाजूला सारण्याची गरज आहे. मी स्वतः १९७१ ...

औरंगाबाद : ‘युद्ध किंवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे. असा समज असलेले समीकरण बाजूला सारण्याची गरज आहे. मी स्वतः १९७१ च्या युद्धात चीनच्या सीमेवर तोफखान्याचा प्रमुख म्हणून काम पाहिले. आज माझ्यासारखे सैनिक तुमच्यासमोर उभे आहेत. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनी मनामध्ये शंका न बाळगता भारतीय सेनेत सामील व्हावे. ती देशसेवा म्हणजे सर्वोच्च मान मी समजतो,’ असे मत कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी व्यक्त केले.

कारगिल विजय दिनानिमित्त गारखेड्यातील कारगिल स्मृतिवनात आयोजित अभिवादनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षीय भाषणात आ. अतुल सावे म्हणाले, कारगिल युद्धात आहुती देणाऱ्या ५२७ जवानांना आणि देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सर्व जवानांमुळे आज आपण इथे सुरक्षित आहोत. त्यांच्या स्मरणार्थ औरंगाबाद येथे स्मृतिवन उभारण्यात आले आहे. सर्वांच्या पुढाकाराने स्मृतिवनाचे रूपांतर स्मारकात व्हायला हवे. कारगिल स्मृतिवन समितीचे पंकज भारसाखळे यांनी प्रस्तावना केली. यावेळी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘जय जवान, जय किसान’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाची सांगता ‘कारगिल शहीद जवान, अमर रहे अमर रहे’ या घोषणेने झाली.

यावेळी कारगिल स्मृतिवन समितीचे निवृत्त पोलीस अधीक्षक वैजनाथ केंद्रे, गंगाधर शेवाळे, अर्जुन गवारे, अप्पा हुळमजगे, डॉ. उदय डोंगरे, भिकन आंबे, प्राचार्य संध्या काळकर, प्राचार्य सपकाळ, प्राचार्य प्रकाश नागरे, राजाराम मोरे, प्रा. गोविंद केंद्रे, कैलास वाहुळे, जसवंतसिंह राजपूत, भास्कर दवंडे, माजी सैनिक संघटनेचे सुभेदार मेजर काशीनाथ पवार, अप्पाजी फुलम्हस्के, पोपटराव नारायण, गजानन पिंपळे, कपिल राऊत, साहेबराव शिंदे, गोपीनाथ कोल्हे, सुदाम साळुंके, रामेश्वर टेहरे, उमाकांत रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत बिऱ्हाडे यांनी केले. जगदीश चव्हाण यांनी आभार मानले.

फोटो ओळ : कारगिल विजय दिनानिमित्त गारखेड्यातील कारगिल स्मृतिवन उद्यानात ‘अमर जवान स्तंभाला’ अभिवादन करताना कॅप्टन सुरेंद्र सुर्वे, आ. अतुल सावे, पंकज भारसाखळे यांच्यासह माजी सैनिक व परिसरातील नागरिक दिसत आहेत.