शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध किंवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ‘युद्ध किंवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे. असा समज असलेले समीकरण बाजूला सारण्याची गरज आहे. मी स्वतः १९७१ ...

औरंगाबाद : ‘युद्ध किंवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे. असा समज असलेले समीकरण बाजूला सारण्याची गरज आहे. मी स्वतः १९७१ च्या युद्धात चीनच्या सीमेवर तोफखान्याचा प्रमुख म्हणून काम पाहिले. आज माझ्यासारखे सैनिक तुमच्यासमोर उभे आहेत. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनी मनामध्ये शंका न बाळगता भारतीय सेनेत सामील व्हावे. ती देशसेवा म्हणजे सर्वोच्च मान मी समजतो,’ असे मत कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी व्यक्त केले.

कारगिल विजय दिनानिमित्त गारखेड्यातील कारगिल स्मृतिवनात आयोजित अभिवादनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षीय भाषणात आ. अतुल सावे म्हणाले, कारगिल युद्धात आहुती देणाऱ्या ५२७ जवानांना आणि देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सर्व जवानांमुळे आज आपण इथे सुरक्षित आहोत. त्यांच्या स्मरणार्थ औरंगाबाद येथे स्मृतिवन उभारण्यात आले आहे. सर्वांच्या पुढाकाराने स्मृतिवनाचे रूपांतर स्मारकात व्हायला हवे. कारगिल स्मृतिवन समितीचे पंकज भारसाखळे यांनी प्रस्तावना केली. यावेळी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘जय जवान, जय किसान’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाची सांगता ‘कारगिल शहीद जवान, अमर रहे अमर रहे’ या घोषणेने झाली.

यावेळी कारगिल स्मृतिवन समितीचे निवृत्त पोलीस अधीक्षक वैजनाथ केंद्रे, गंगाधर शेवाळे, अर्जुन गवारे, अप्पा हुळमजगे, डॉ. उदय डोंगरे, भिकन आंबे, प्राचार्य संध्या काळकर, प्राचार्य सपकाळ, प्राचार्य प्रकाश नागरे, राजाराम मोरे, प्रा. गोविंद केंद्रे, कैलास वाहुळे, जसवंतसिंह राजपूत, भास्कर दवंडे, माजी सैनिक संघटनेचे सुभेदार मेजर काशीनाथ पवार, अप्पाजी फुलम्हस्के, पोपटराव नारायण, गजानन पिंपळे, कपिल राऊत, साहेबराव शिंदे, गोपीनाथ कोल्हे, सुदाम साळुंके, रामेश्वर टेहरे, उमाकांत रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत बिऱ्हाडे यांनी केले. जगदीश चव्हाण यांनी आभार मानले.

फोटो ओळ : कारगिल विजय दिनानिमित्त गारखेड्यातील कारगिल स्मृतिवन उद्यानात ‘अमर जवान स्तंभाला’ अभिवादन करताना कॅप्टन सुरेंद्र सुर्वे, आ. अतुल सावे, पंकज भारसाखळे यांच्यासह माजी सैनिक व परिसरातील नागरिक दिसत आहेत.