शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वक्फ मंडळच झाले अनाथ!

By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद अल्पसंख्याक समाजातील गोर-गरीब नागरिक, अनाथ मुले, विधवा महिलांच्या पालन-पोषणासाठी वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आले

मुजीब देवणीकर , औरंगाबादअल्पसंख्याक समाजातील गोर-गरीब नागरिक, अनाथ मुले, विधवा महिलांच्या पालन-पोषणासाठी वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आले. राज्यात ९३ हजार एकर जागेची मालकी असलेल्या वक्फ मंडळाला राज्यात विभागीय कार्यालये स्थापन करण्यासाठी जागाच मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र वक्फ मंडळाचे मुख्य कार्यालय औरंगाबादेत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या नागरिकांना, वक्फ प्रॉपर्टीशी संबंधित पाठपुरावा करण्यासाठी नागरिकांना थेट औरंगाबादेत यावे लागत होते. राज्यातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी दोन वर्षांपूर्वी शासनाने विभागीय कार्यालये सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयामुळे वक्फ मंडळाचे काम अधिक गतीने होईल, नागरिकांची कामे लवकर होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. राज्यात वक्फ मंडळाच्या २३ हजार ५६६ मालमत्ता आहेत. या मालमत्तांची देखरेख करण्याची जबाबदारी मंडळावर आहे. मंडळाकडे फक्त ५४ कर्मचारी असल्याने एवढा मोठा व्याप सांभाळणे अवघड होऊन बसले आहे. वक्फच्या बहुतांश मालमत्तावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे पक्की असून मंडळाला ती हटविणे अवघड होऊन बसले आहे. अनेक मालमत्तांसंदर्भात न्यायालयांमध्ये वादही सुरू आहेत. ४मागीलवर्षी नागपूर येथे तत्कालीन अल्पसंख्याक विकासमंत्री नसीम खान यांनी वक्फ कार्यालयाचे उद्घाटनही केले. याशिवाय अमरावती, पुणे, मुंबई, नाशिक आदी शहरांमध्ये कार्यालये सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले होते.४यासंदर्भात वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद एजाज हुसैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. ४या कार्यालयांना कायमस्वरूपी जागा शोधण्यात येत आहे. लवकरात लवकर जागाही मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.