शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

स्मार्ट सिटीचे कार्यालय उभारण्यास वक्फ बोर्डाचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:02 IST

औरंगाबाद : केंद्र, राज्य शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास ५०० कोटींचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून आमखास मैदानाजवळ ...

औरंगाबाद : केंद्र, राज्य शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास ५०० कोटींचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून आमखास मैदानाजवळ असलेल्या एका जुन्या इमारतीत स्मार्ट सिटीचे भव्यदिव्य कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी निविदासुद्धा अंतिम करण्यात आली. आता महाराष्ट्र वक्फ बोर्डाने महापालिकेला पत्र पाठवून स्मार्ट सिटीच्या कार्यालयाचे काम सुरू करू नये, केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. विशेष बाब म्हणजे, या कार्यालयाच्या कामावर तब्बल पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राला लागूनच असलेल्या सिटी सर्व्हे नंबर २१० मधील जागेवर मुख्य कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीपासून ही जागा पालिकेच्या ताब्यात असून त्याचा वापर आता स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी करण्याचे ठरले आहे. येथे स्मार्ट सिटीच्या एमएसआय प्रकल्पाअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या सीसीटीव्हींच्या दोन कमांड सेंटरपैकी एक सेंटरदेखील उभारले जाणार आहे. मात्र, आता ही जागा वादात सापडली आहे. या जागेवरील बांधकामावर वक्फ बोर्डाने आक्षेप घेतला असून पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांना पत्र पाठवून बांधकाम त्वरित थांबविण्याची सूचना केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, आमखास मैदानावरील सिटी सर्व्हे क्रमांक २१० मधील २१ एकर २८ गुंठे असलेली ही जागा वक्फ बोर्डाची आहे. २० जून २०१४ रोजीच्या आदेशान्वये ही जागा वक्फ बोर्डाची घोषित करून जामा मशिदीला देवस्थानासाठी दिली आहे. या निर्णयाला पालिकेने २०१४ मध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, ४ जानेवारी २०१७ मध्ये न्यायालयाने पालिकेचा दावा रद्द केला. त्यानंतर याविषयी उच्च न्यायालयात पालिकेने दावा दाखल केल्याची सूचना वक्फ बोर्डाला दिलेली नाही. असे असतानाही वक्फ बोर्डाला कोणतीही सूचना न करता, परवानगी न घेताच स्मार्ट सिटीचे कार्यालय या जागेवर बेकायदेशीरपणे उभारले जात आहेत. ते त्वरित थांबवावे.

भूमिअभिलेखच्या नोंदीत जागा शासनाच्या नावे

स्मार्ट सिटीचे कार्यालय उभारली जाणारी ही जागा १९७१ मध्ये जमीन एकत्रिकरण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाची म्हणून घोषित केली आहे. या जागेच्या मालकीहक्काबाबत पीआर कार्डवर वक्फ बोर्डाच्या नावे लावून घेण्यासाठी योग्य ती कार्यवाहीदेखील केली जात आहे.