शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विमा कंपन्यांचे खिसे भरायचे का? शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:04 IST

कन्नड : तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशी आणि मका या पिकांचे मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान होऊनही शेतकरी पीकविमा ...

कन्नड : तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशी आणि मका या पिकांचे मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान होऊनही शेतकरी पीकविमा मिळण्यापासून वंचित राहिले. त्यामुळे यंदा या दोन्ही पिकांचा विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. पीकविमा काढून विमा कंपन्यांचे खिसे भरायचे का? असा शेतकऱ्यांनी सवाल करून पीकविमा न भरलेलाच भरा, अशी भूमिका घेतलेली दिसून येत आहे.

मागील वर्षी जास्तीचा पाऊस पडला. कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी झाली. अतिपावसामुळे कपाशीच्या कैऱ्या सडल्या, तशात बोंडअळीने कहर केला. जिथे कपाशीच्या चार ते पाच वेचण्या होतात, तिथे दोन वेचण्यांत कापूस संपला. जिथे बागायती कापसाचे उत्पन्न हेक्टरी २५ क्विंटल येते. ते चार ते पाच क्विंटलवर आले. मात्र, असे असताना कपाशीचा विमा मिळाला नाही. हीच परिस्थिती मका पिकाची झाली. आधीच लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव त्यात पीक काढणीच्या वेळी पाऊस. त्यामुळे कणसांना मोड येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरीही, मका पिकाचा विमा मिळाला नाही. त्याऐवजी तूर, उडीद, मूग व तेलवर्गीय सोयाबीन या पिकांचा विमा काढण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला.

तुलनात्मक तक्ता

कंसात मागील वर्षी विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या

कापूस : १३ हजार ५३४ शेतकरी (२९ हजार १०६)

मका : २४ हजार ९६९ शेतकरी (४७ हजार ८८२)

बाजरी : ८८४ शेतकरी (१ हजार ८८२ )

कांदा : ३४१ शेतकरी (३८८),

या पिकांचा विमा काढण्याकडे वाढला कल

सोयाबीन : ६ हजार ७३ शेतकरी (३ हजार ७३८),

मूग : ५ हजार ५३२ शेतकरी (३ हजार ८९६),

उडीद : १ हजार ९८० शेतकरी (९३३),

तूर : १४ हजार ६५८ शेतकरी (८ हजार ९२)

----

पीकविमा काढण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावर्षी सरासरी क्षेत्रापैकी कापूस आणि मका पिकांच्या लागवड क्षेत्रातही घट झाली आहे. त्याऐवजी ऊस, मिरची, टोमॅटो लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात तीन पटीने वाढ झाली आहे. - बाळराजे मुळीक, तालुका कृषी अधिकारी

---

अतिवृष्टीमुळे आणि पूरपरिस्थितीमुळे पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे प्रशासनाने पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवले. परंतु, दुसरीकडे पीकविमा नाकारण्यात आला. यावरून विमा कंपन्यांची मानसिकता लक्षात आल्याने कापूस आणि मका पिकाचा विमा काढण्यात शेतकऱ्यांत उदासीनता दिसून येत आहे. - अप्पासाहेब नलावडे, शेतकरी, कानडगाव