शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

सातव की वानखेडे? आज फैसला होणार

By admin | Updated: May 16, 2014 00:17 IST

हिंगोली : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. राजीव सातव यांच्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आ. सातव विजयी होणार की, खा. सुभाष वानखेडे, याचा फैैसला

हिंगोली : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. राजीव सातव यांच्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आ. सातव विजयी होणार की, खा. सुभाष वानखेडे, याचा फैैसला शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत होणार आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तूळातून वर्तविली जात आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या आतापर्यंत झालेल्या १० निवडणुकांमध्ये काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी ४ वेळा तर राष्टÑवादी व जनता पक्षाने प्रत्येकी एक वेळा विजय मिळविला आहे. काँग्रेस- शिवसेनेने आतापर्यंत बरोबरी साधल्यानंतर आता पाचव्यांदा कोणता पक्ष विजय मिळवेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. राजीव सातव पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आ. सातव यांच्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघ देशभरात लक्षवेधी बनला आहे. दुसर्‍यांदा हिंगोली लोकसभेतून विजय मिळू पाहणारे शिवसेनेचे खा. सुभाष वानखेडे यांच्यासमोर आ. सातव यांनी जोरदार आव्हान निर्माण केले. या निवडणुकीत आ. सातव यांच्या विजयासाठी जसे शिवसेनेतील काही नेत्यांनी प्रयत्न केले, तसे खा. वानखेडे यांच्या विजयासाठी काँग्रेस व राष्टÑवादीच्याही काही नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्याच अर्थाने चर्चेला आली. आघाडी धर्म व पक्षनिष्ठा बाजूला टाकून वैैयक्तिक द्वेषापोटी निवडणुकीतील उमेदवारांना पराभूत करण्याचा चंग बांधलेल्या नेतेमंडळींसाठीही ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात बर्‍याच घडामोडी होणार असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. या निवडणुकीचा परिणाम पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीतून ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)