शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

तरुणाईच्या भटकंतीमुळे मुले, ज्येष्ठांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:02 IST

६ मार्चपासून शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. प्रारंभी जिल्हा प्रशासनाकडून संसर्ग थांबविण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या. त्याचा किंचितही ...

६ मार्चपासून शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. प्रारंभी जिल्हा प्रशासनाकडून संसर्ग थांबविण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या. त्याचा किंचितही परिणाम दिसून आला नाही. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाल्याने राज्यशासनाने स्थगिती दिली. आता राज्य शासनाकडूनच व्यापक प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. शनिवार, रविवार वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यानंतरही असंख्य तरुण शहरात फिरत आहेत. विशेष बाब म्हणजे यातील काही तरुण मास्कचा वापरही करत नाहीत. पोलिसांनी दिवसा किंवा रात्री या तरुणांना पकडले तर वेगवेगळी कारणे सांगण्यात येतात. अनेकदा पोलीस मास्क न वापरल्याबद्दल आणि रात्री उशिरा संचारबंदीत फिरत असल्याने पाचशे रुपये दंड आकारत आहेत. त्यानंतरही शहरात तरुणाईच्या फिरण्यात फरक पडलेला नाही. रात्री उशिरा तरुण संसर्ग घेऊन घरात जात आहेत. घरातील लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक बाधित होत आहेत.

ही पहा उदाहरणे

सातारा भागात राहणारे एका कुटुंबातील लहान २ लहान मुले आणि एक ज्येष्ठ नागरिक कोरोना बाधित झाले. त्यांच्या संपर्कातील कुटुंबीयांची तपासणी केली असता त्यातील दोन तरुण पॉझिटिव्ह आले. विशेष बाब म्हणजे या तरुणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. दोन्ही तरुण काही दिवसांपासून संसर्ग घरात आणि बाहेर पसरवत होते. आपण घरात कोरोना संसर्ग पसरवत आहोत याची किंचितही जाणीव त्या तरुणांना नव्हती.

सिडको एन-४ भागातील एकाच कुटुंबातील सर्व सहा सदस्य कोरोना बाधित आढळून आले. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने याची अधिक माहिती घेतली असता घरातील एक तरुण सकाळ-दुपार-संध्याकाळ मित्रांकडे ये-जा करीत होता. घरातील इतर सदस्य बाहेर ये-जा करण्याचा प्रश्नच नव्हता. घरात तरुणाने संसर्ग आणला असावा असा निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने काढला.

बाहेरून आल्यानंतर उपाययोजना करायला हव्यात

शहरात काही दिवसांपासून कोरोनाचा नवीन स्ट्रेन धुमाकूळ घालत आहे. कमी वय असलेल्या तरुणांचा यामध्ये मृत्यू होत आहे. यानंतरही शहरातील तरुण ही अत्यंत बेफाम झाली आहे.

घरात आल्यानंतर सर्वप्रथम गरम पाण्याने हात पाय धुतले पाहिजेत. निर्जंतुकीकरण औषधांचा वापर केला पाहिजे. शक्य असेल तर अंघोळ करायला हवी. बाहेर घातलेले कपडे त्वरित गरम पाण्यात घातले पाहिजेत.

घरात जेष्ठ नागरिक असतील तर थेट त्यांच्या जवळ जायला नको, लहान मुले असतील तर त्यांना त्वरित जवळ घेऊ नये. प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्क वापरलाच पाहिजे.

१०६५

सोळा वर्षाखालील पॉझिटिव्ह

१९,७४९

पन्नास पेक्षा जास्त वय असलेले पॉझिटिव्ह

६७, ९३६

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण

ज्येष्ठ लहान मुलांची इम्युनिटी कमी असते

ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळे आजार असतात. त्यांची इम्युनिटी खूप कमी असते. लहान मुलांची इम्युनिटी जास्त नसते. त्यामुळे घरातील मंडळींनी बाहेर वावरताना खूप काळजी घेतली पाहिजे. घरात गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या जवळ जाऊन बसू नये.

डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा