शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

१०० कोटींच्या निधीची प्रतीक्षाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:21 IST

शिवसेना-भाजप युती सरकारने औरंगाबाद शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा चार महिन्यांपूर्वी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेना-भाजप युती सरकारने औरंगाबाद शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा चार महिन्यांपूर्वी केली. महापालिकेनेही मोठा गाजावाजा करीत रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढल्या. आता निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असली तरी शासनाकडून एक रुपयाही प्राप्त झालेला नाही. चालू आर्थिक वर्षाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदच नाही. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत निधी येण्याची शक्यता कमी आहे. पुढील वर्षी निधी येऊ शकतो. शासनाकडून निधी न आल्यास संपूर्ण रक्कम मनपाला आपल्या तिजोरीतून खर्च करावी लागेल.राज्याची आर्थिक स्थितीही खूप काही चांगली नाही. मागील दीड ते दोन वर्षांपासून महापालिकेकडून सतत रस्त्यांसाठी निधी द्यावा म्हणून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत दहा महिने भाजपचामहापौर होता. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानाकडे बराच पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटी रुपये देण्याचे तत्त्वत: मान्य केले. निधी मिळाल्याचा आनंद भाजपकडून गगनात मावेनासा झाला होता. शहरात मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आले. निधी आणल्याचे श्रेय स्थानिक नेते लाटू लागले. १०० कोटींत रस्ते कोणते घ्यावेत या मुद्यावरून जोरदार राजकारण झाले. भाजप महापौरांच्या कार्यकाळातच रस्त्यांच्या कामांचा नारळ फुटावा म्हणून तत्कालीन महापौरांनी जंगजंग पछाडले; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांचा कार्यकाळ संपला तरी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. सोमवारी खंडपीठाने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता निविदा उघडून लवकरच वर्क आॅर्डर देण्यात येईल.आता महापौरपद सेनेकडे आहे. रस्त्यांच्या कामांचे संपूर्ण श्रेय लाटण्यासाठी सेना सज्ज झाली आहे. रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी लवकरच युवा नेते आदित्य ठाकरे येणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन व्हावे या दृष्टीने सेनेने व्यूव्हरचना आखली आहे. भाजपच्या अंतर्गत कलहाची किंमत या कामाच्या निमित्ताने चुकवावी लागणार आहे.