शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

रक्तपेढ्यांना प्रतीक्षा दात्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:19 IST

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुका त्यानंतर आलेली दिवाळी यामुळे रक्तदान शिबिरे ठप्प झाली असून त्याचा मोठा फटका रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना बसत आहे़ शहरातील पाच आणि शासकीय रुग्णालयातील एक अशा सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़ त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुका त्यानंतर आलेली दिवाळी यामुळे रक्तदान शिबिरे ठप्प झाली असून त्याचा मोठा फटका रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना बसत आहे़ शहरातील पाच आणि शासकीय रुग्णालयातील एक अशा सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़ त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे़नांदेड जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई, त्यानंतर चलनटंचाईने नागरिक त्रस्त होते़ आता मात्र रक्ताची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे़ गेले दीड महिना शहरात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु होती़ आचारसंहिता सुरु असल्यामुळे राजकीय पक्षांनीही रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम आयोजित केले नाहीत़ त्यात इतरही सामाजिक संघटनांनी जयंती, पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित केली नाहीत़ निवडणूक संपताच दिवाळीचा सण आला़ या काळात शाळा-महाविद्यालयांनी सुट्या असतात़ दरवर्षी दिवाळीच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवतो़ परंतु यंदा त्यापूर्वी निवडणुका आल्याने रक्तदान शिबिरांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली़ शासकीय रुग्णालयात सुसज्ज रक्तपेढी आहे़ या ठिकाणी दररोज नांदेडसह, हिंगोली, परभणी, यवतमाळ शेजारील आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात़ त्यामुळे अपघातातील जखमी, प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर मातांचाही मोठा समावेश असतो़ शस्त्रक्रियेनंतर यातील अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते़परंतु शासकीय रक्तपेढीतही रक्ताची कमतरता आहे़ रुग्णांच्या नातेवाईकालाच दात्याची व्यवस्था करावी लागत आहे़ रक्तासाठी ऐनवेळी धावपळ करण्याची वेळ येत असल्याने रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीला आले आहेत़ नातेवाईक किंवा त्याच रक्तगटाच्या व्यक्तीला शोधून आणण्यात वेळ आणि पैसा खर्च होत आहे़ शासकीय रुग्णालयात दररोज ३० पेक्षा अधिक रक्ताच्या पिशव्यांची गरज आहे़ त्यामुळे रुग्णालयाला सातत्याने रक्तदात्यांची प्रतीक्षा असते़ त्याचबरोबर दुसरीकडे शहरात खाजगी रुग्णालयांची संख्याही लक्षणीय आहे़ या रुग्णालयांमध्ये दररोज होणाºया शस्त्रक्रिया व इतर आजारासाठी रुग्णांना रक्त लागते़ परंतु सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़