शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाची प्रतीक्षा!

By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शाखा औरंगाबादेत सुरू व्हावी यासाठी मागील काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शाखा औरंगाबादेत सुरू व्हावी यासाठी मागील काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शहराजवळील तीन नियोजित जागांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला. अहवालाच्या अनुषंगाने केंद्रीय मानव संसाधन विभागाचे पथक जागेच्या पाहणीसाठी कधी येईल, याची प्रतीक्षा औरंगाबादकरांना आहे.विख्यात आयआयएमसारखी प्रसिद्ध संस्था औरंगाबाद शहरात आल्यास मराठवाड्याच्या विकासाला आणखी चालना मिळेल, भविष्यातील डीएमआयसी प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून ही संस्था औरंगाबादेत सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. आयआयएमच्या उभारणीसाठी किमान शंभर एकर जागेची गरज असून, मागील दोन महिन्यांपासून जागेची चाचपणी सुरू करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात राज्य शासनाला आपला अहवाल सादर केला. अहवालात तीन जागांचा उल्लेख करण्यात आला असून, यामध्ये अब्दीमंडी, करोडी आणि डीएमआयसीचा समावेश आहे.जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने तिन्ही जागांची पाहणी करून अहवाल सादर केला. या अहवालाची प्रत प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांना पाठविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने आयआयएमसाठी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर केंद्र शासनाची टीम शहरात जागेच्या पाहणीसाठी येईल. ही समिती लवकरात लवकर यावी या दृष्टीनेही काही औद्यागिक संघटनांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे औरंगाबादेत आयआयएमला केंद्र शासनाने मंजुरी दिल्यास भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच यावे, अशीही मागणी औद्यागिक संघटना करीत आहेत.