शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

दीड वर्षांपासून लाभार्थी प्रतीक्षेत

By admin | Updated: July 27, 2014 01:16 IST

निवघा बाजार : मौजे शिरड ता़ हदगाव येथील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१२-१३ मध्ये २९ घरकुल मंजूर झाले़

निवघा बाजार : मौजे शिरड ता़ हदगाव येथील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१२-१३ मध्ये २९ घरकुल मंजूर झाले़ परंतु दोन वर्षे उलटली तरी लाभार्थी प्रतीक्षेतच असल्याने घरकुल मिळते की नाही असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे़शिरड येथील २९ लाभार्थ्यांची घरकुलाची निवड झाली तेव्हा लाभार्थ्यांकडून ग्रा़ पं़ ने घरपट्टी, नळपट्टी वसूल केली़ अडीच हजार रुपये भरून राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढावे लागले़ यामुळे लाभार्थ्यांनी सावकारी कर्ज काढून पैशाची जमवाजमव केली, परंतु दोन वर्षे उलटले तरी अद्याप घरकुलाचा मावेजा मिळाला नाही़ याबाबत ग्रा़पं़ कार्यालयास विचारणा केली असता घरकुल योजनेस पाणीटंचाईमुळे स्टे आल्याचे सांगितले़ परंतु पाणीटंचाई संपली, दोन वर्षे उलटले तरी स्टे उठला नाही का? असा प्रश्न पडत आहे़याबाबत ग्रामविकास अधिकारी राहुल गिरबिडे यांना विचारणा केली असता पाणीटंचाई संपल्यानंतर तत्कालीन ग्रामसेवकाने पंचायत समितीला माहिती दाखल करायला हवी होती़ परंतु तसे त्यांनी केले नाही़ आता मी एक दोन दिवसांत वरिष्ठांना घरकूल संदर्भातील माहिती पुरवितो असे सांगितले़ केवळ ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांना दोन वर्षांपासून वंचित रहावे लागले एवढे मात्र खरे़ (वार्ताहर)