शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणी मोहीम पुन्हा सुरू

By admin | Updated: June 10, 2014 00:57 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून मतदार नोंदणी मोहीम सुरू झाली.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून मतदार नोंदणी मोहीम सुरू झाली. ३० जूनपर्यंत सर्व मतदान केंद्रे तसेच तहसील कार्यालयांमध्ये नोंदणी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यावेळी नोंदणी केल्यानंतर अर्जदारांना लगेचच पक्की पावती दिली जाणार आहे. तसेच अर्जांची रोजच्या रोज डाटा एंट्री केली जाणार असल्यामुळे अर्जदारांना त्यांच्या अर्जांचे स्टेटस आॅनलाईन कळेल.लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यातील नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्यामुळे राज्यभर तक्रारी झाल्या. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने विधानसभा निवडणुकीआधी व्यापक मतदार नोंदणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले की, जिल्ह्यात आजपासून नोंदणी मोहीम सुरू झाली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर नोंदणीसाठी केंद्रस्तरीय अधिकारी नेमले गेले आहेत. हे अधिकारी दिवसभर केंद्रांवर इच्छुकांचे अर्ज स्वीकारतील. याशिवाय तहसील कार्यालयातही अर्ज स्वीकारले जातील. ज्यांची नावे मतदार यादीत नसतील त्यांनी वरील ठिकाणी आपले अर्ज भरावेत. बऱ्याच वेळा अर्ज देऊनही यादीत नावाचा समावेश झाला नाही, अशी तक्रार असते. त्यामुळे यावेळी नोंदणी अर्ज घेतल्यानंतर नागरिकांना शिक्का मारून त्याची पावती दिली जाईल. अर्जदाराकडे त्याचा पुरावा राहील. तसेच आलेल्या अर्जांची डाटा एंट्री रोज केली जाईल. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही त्याची माहिती असेल. परिणामी या पावतीच्या आधारे नागरिकांना त्यांच्या अर्जाचे स्टेटस आॅनलाईनही बघता येईल, असे विक्रमकुमार म्हणाले. जिल्ह्यात याआधी ज्यांची नावे वगळली गेली, त्यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला जाईल. जे लोक अजूनही जुन्याच पत्त्यावर राहतात, त्यांचे नाव यादीत समाविष्ट केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे प्रारूप याद्या देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना तेथे जाऊन नावाची खात्री करावी, असे ते म्हणाले. मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान २१, २२, २८ आणि २९ जून हे दिवस विशेष नोंदणी दिवस म्हणून केले जातील. या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार याद्यांचे वाचन होईल. त्यामुळे नागरिकांना यादीत आपले नाव आहे किंवा नाही हे कळू शकेल.ज्यांचे नाव यादीत नसेल त्यांना लगेच तेथेच अर्ज भरून नोंदणी करता येऊ शकेल, असे विक्रमकुमार यांनी सांगितले.