शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मतदार नोंदणी मोहीम पुन्हा सुरू

By admin | Updated: June 10, 2014 00:57 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून मतदार नोंदणी मोहीम सुरू झाली.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून मतदार नोंदणी मोहीम सुरू झाली. ३० जूनपर्यंत सर्व मतदान केंद्रे तसेच तहसील कार्यालयांमध्ये नोंदणी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यावेळी नोंदणी केल्यानंतर अर्जदारांना लगेचच पक्की पावती दिली जाणार आहे. तसेच अर्जांची रोजच्या रोज डाटा एंट्री केली जाणार असल्यामुळे अर्जदारांना त्यांच्या अर्जांचे स्टेटस आॅनलाईन कळेल.लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यातील नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्यामुळे राज्यभर तक्रारी झाल्या. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने विधानसभा निवडणुकीआधी व्यापक मतदार नोंदणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले की, जिल्ह्यात आजपासून नोंदणी मोहीम सुरू झाली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर नोंदणीसाठी केंद्रस्तरीय अधिकारी नेमले गेले आहेत. हे अधिकारी दिवसभर केंद्रांवर इच्छुकांचे अर्ज स्वीकारतील. याशिवाय तहसील कार्यालयातही अर्ज स्वीकारले जातील. ज्यांची नावे मतदार यादीत नसतील त्यांनी वरील ठिकाणी आपले अर्ज भरावेत. बऱ्याच वेळा अर्ज देऊनही यादीत नावाचा समावेश झाला नाही, अशी तक्रार असते. त्यामुळे यावेळी नोंदणी अर्ज घेतल्यानंतर नागरिकांना शिक्का मारून त्याची पावती दिली जाईल. अर्जदाराकडे त्याचा पुरावा राहील. तसेच आलेल्या अर्जांची डाटा एंट्री रोज केली जाईल. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही त्याची माहिती असेल. परिणामी या पावतीच्या आधारे नागरिकांना त्यांच्या अर्जाचे स्टेटस आॅनलाईनही बघता येईल, असे विक्रमकुमार म्हणाले. जिल्ह्यात याआधी ज्यांची नावे वगळली गेली, त्यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला जाईल. जे लोक अजूनही जुन्याच पत्त्यावर राहतात, त्यांचे नाव यादीत समाविष्ट केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे प्रारूप याद्या देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना तेथे जाऊन नावाची खात्री करावी, असे ते म्हणाले. मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान २१, २२, २८ आणि २९ जून हे दिवस विशेष नोंदणी दिवस म्हणून केले जातील. या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार याद्यांचे वाचन होईल. त्यामुळे नागरिकांना यादीत आपले नाव आहे किंवा नाही हे कळू शकेल.ज्यांचे नाव यादीत नसेल त्यांना लगेच तेथेच अर्ज भरून नोंदणी करता येऊ शकेल, असे विक्रमकुमार यांनी सांगितले.