शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

मार्च २०२० मधील मतदार यादी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

औरंगाबाद : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी आता नव्याने मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे मार्च २०२० ...

औरंगाबाद : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी आता नव्याने मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे मार्च २०२० मधील मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने रद्द ठरविली आहे. याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी केले आहे.

नवीन मतदारांना निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, निवडणूक आयोगाकडून मतदार यादी कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रकात म्हटले आहे, एप्रिल-मे २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी व इतर चार पोटनिवडणुकीसाठी निर्धारित कार्यक्रमानुसार ९ मार्च २०२० रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करुन १६ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. २३ मार्च २०२० रोजी अंतिमरित्या यादी प्रसिध्द करायची होती. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यास स्थगिती देण्यात आली. १७ मार्चपासून आहे त्या स्थितीत पुढील आदेशापर्यंत स्थगिती आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०२० या पात्रता दिनांकावर विधानसभा मतदार यादी अद्ययावत करुन २५ सप्टेंबर २०२० रोजी अंतिम यादी प्रसिध्द केली आहे. दरम्यान आजवरच्या घडामोडींना पाहता नव्याने मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे २४ फेब्रुवारी २०२० रोजीच्या आदेशान्वये दिलेला मतदार यादीचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे.