शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी अशी घ्यावी काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 20:03 IST

सूर्य आग ओकतोय अन् प्रचाराचा पाराही चढलाय

ठळक मुद्देडॉक्टरांचा सल्ला, जास्त पाणी प्या, बाहेरचे खाणे टाळा

औरंगाबाद : शहरात लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचू लागला आहे आणि तसा तापमानाचा पाराही चढू लागला आहे. अशावेळी रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुरेशी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा उष्माघाताचा फटका बसलाच समजा. त्यामुळे कार्यकर्त्यांनी योग्य काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

जिल्ह्यात २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. प्रचारासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहे. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. प्रचारात कार्यकर्त्यांची फौज ही सर्वांत महत्त्वाची कामगिरी पार पाडत आहेत. त्यांच्याकडून भर उन्हात एक-एक भाग पिंजून काढला जात आहे. शहरात एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासून पारा ४० अंशांवर जाऊन पोहोचला आहे. उन्हामुळे अनेकांकडून प्रचारासाठी सकाळी व सायंकाळच्या वेळेला प्राधान्य दिले जात आहे, तर अनेक जण उन्हाची कोणतीही पर्वा करताना दिसत नाही. रणरणत्या उन्हात प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण करीत आहे; परंतु उन्हामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. उष्माघाताबरोबर सौम्य उष्माघाताचाही (माईल्ड सनस्ट्रोक) धोका असतो. त्यामुळे उन्हात फिरताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे. नाही तर उन्हाच्या चटक्याने आरोग्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिले पाहिजे.

खबरदारी घ्यावीउन्हामुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. सर्वात मोठा धोका उष्माघाताचा असतो. उष्णतेमुळे व्यक्तीला थकवा येतो. तापमान वाढल्यावर शरीरातून घाम येतो.  त्यातून शरीराचे तापमान वाढून जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. या पाण्यात ग्लुकोज, मीठ टाकले पाहिजे. मधुमेह, हायपरटेन्शन असणाऱ्या तसेच ज्येष्ठांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. -डॉ. गजानन सुरवाडे, फिजिशियन आणि प्रभारी विभागप्रमुख, मेडिसीन विभाग, घाटी

तापमान वाढणारउन्हामध्ये आगामी दिवसात आणखी वाढ होईल. हवामान कोरडे राहील. तापमान साधारणपणे ४० अंशांच्या पुढेच राहणार आहे. शिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानाच्या सरासरीत वाढ होत आहे. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. -किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ, हवामान अभ्यासक

हे कराल तर वाचाल?- उन्हात फिकट रंगाचे आणि सैल कपडे परिधान केले पाहिजे. डोक्यावर टोपी, रुमाल वापरला पाहिजे. टोपीला छिद्रे असणे आवश्यक असते. - उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते. शरीराचे तापमान वाढते. त्यातून व्यक्तीला दम लागतो. उन्हात चक्कर आली, थकवा अधिक जाणवायला लागला तर विश्रांती घ्यावी.- उन्हाचा त्रास जाणवत असेल तर थंड पाणी प्यावे. अधिक त्रास होत असेल तर थंड पाण्याने आंघोळ करावी. शरीरातील मूलद्रव्य पाण्याद्वारे भरून काढावे. त्यासाठी जलसंजीवनीचे (ओआरएस) पाणी द्यावे.- उन्हामुळे व्यक्ती जर बेशुद्ध झाला असेल, तर रुग्णालयात दाखल करावे. प्रचारासाठी सकाळी अथवा सायंकाळच्या वेळेला प्राधान्य द्यावे.  बाहेरचे खाणे-पिणे कटाक्षाने टाळावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019