शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विठू विठू नामाचा जयघोष..!

By admin | Updated: July 16, 2016 01:09 IST

जालना : विठ्ठला... पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल, जयहरी.., माऊली, माऊली... भज गोविंदम, भज गोपाला... यासारखा जयघोष शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये ऐकावयास मिळाला.

जालना : विठ्ठला... पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल, जयहरी.., माऊली, माऊली... भज गोविंदम, भज गोपाला... यासारखा जयघोष शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये ऐकावयास मिळाला. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये दिवसभर लाखो भाविकांनी शिस्तबद्ध आणि रांगेतून शांततेत दर्शन घेतले. यावेळी भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे शुक्रवारच्या दिवशी जालना शहरात अवघी पंढरीच अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले.जिल्ह्यात शुक्रवारी आषाढी एकादशी अपूर्व उत्साहात पार पडली. शहरातील जुना जालन्यात असणाऱ्या आनंदीस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. यामध्ये महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच आरती झाल्यानंतर सकाळी आनंदीस्वामी यांची पालखी मंदिरापासून निघाली. या पालखी सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग नोंदविला होता. भाळी अष्टगंध, गळ्यात टाळ, मृदंग, डोक्यावर विठ्ठल, विठ्ठल नाव लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रूमाल, झेंडे, पताके लेझिम, बँड पथक, हालगी पथक, दांडपट्टा यामुळे पालखी मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आनंदीस्वामी मंदिरापासून निघालेली ही पालखी शनि मंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, विठ्ठल मंदिर, गांधी चमन मार्गे आनंदीस्वामी मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुस्लिम समाजाची २८ वर्षांची परंपराएकतेचा संदेश : पालखीचे स्वागत, वारकऱ्यांचा सत्कार जालना : हिंदु, मुस्लीम, शिख, इसाई... हम सभ है भाई भाई... या ओळींचा प्रत्यय शुक्रवारी जालना शहरातील जामा मस्जीदसमोर आला. मुस्लीम समाज बांधवांकडून आनंदीस्वामींच्या पालखीचे स्वागत करण्याबरोबरच वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. २८ वर्षांची परंपरा आजही कायम असून यातून एकतेचा संदेश देण्यात येतो.‘भज गोविंदम भज गोपाला...’ असा जयघोष करीत आनंदीस्वामींची पालखी शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास जामा मस्जीदसमोर आली. येथे मुस्लीम समाजाच्यावतीने स्वागत करण्याची २८ वर्षांपासूनची परंपरा आहे. शुक्रवारीही समाजाच्यावतीने पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी इश्वर वसावे, सोहेल खान, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पवार, शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी, शेख मेहमूद, शेख अख्तर अहेमद यांची प्रमुख उपस्थित होते. स्वागत, सत्कार कार्यक्रमानंतर ही पालखी गांधी चमन परिसराकडे मार्गस्थ झाली. यावेळी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. सय्यद जावेद अली, जब्बार खान, शेख जावेद, शेख निजाम, शेख जब्बार, शेख जमील, अमजद खान, लईक शेख, शेख अजहर, शफी अहेमद आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.नामाचा जयघोष..!जालना : विठ्ठला... पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल, जयहरी.., माऊली, माऊली... भज गोविंदम, भज गोपाला... यासारखा जयघोष शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये ऐकावयास मिळाला. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये दिवसभर लाखो भाविकांनी शिस्तबद्ध आणि रांगेतून शांततेत दर्शन घेतले. यावेळी भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे शुक्रवारच्या दिवशी जालना शहरात अवघी पंढरीच अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले.जिल्ह्यात शुक्रवारी आषाढी एकादशी अपूर्व उत्साहात पार पडली. शहरातील जुना जालन्यात असणाऱ्या आनंदीस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. यामध्ये महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच आरती झाल्यानंतर सकाळी आनंदीस्वामी यांची पालखी मंदिरापासून निघाली. या पालखी सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग नोंदविला होता. भाळी अष्टगंध, गळ्यात टाळ, मृदंग, डोक्यावर विठ्ठल, विठ्ठल नाव लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रूमाल, झेंडे, पताके लेझिम, बँड पथक, हालगी पथक, दांडपट्टा यामुळे पालखी मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आनंदीस्वामी मंदिरापासून निघालेली ही पालखी शनि मंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, विठ्ठल मंदिर, गांधी चमन मार्गे आनंदीस्वामी मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुस्लिम समाजाची २८ वर्षांची परंपराएकतेचा संदेश : पालखीचे स्वागत, वारकऱ्यांचा सत्कार जालना : हिंदु, मुस्लीम, शिख, इसाई... हम सभ है भाई भाई... या ओळींचा प्रत्यय शुक्रवारी जालना शहरातील जामा मस्जीदसमोर आला. मुस्लीम समाज बांधवांकडून आनंदीस्वामींच्या पालखीचे स्वागत करण्याबरोबरच वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. २८ वर्षांची परंपरा आजही कायम असून यातून एकतेचा संदेश देण्यात येतो.‘भज गोविंदम भज गोपाला...’ असा जयघोष करीत आनंदीस्वामींची पालखी शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास जामा मस्जीदसमोर आली. येथे मुस्लीम समाजाच्यावतीने स्वागत करण्याची २८ वर्षांपासूनची परंपरा आहे. शुक्रवारीही समाजाच्यावतीने पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी इश्वर वसावे, सोहेल खान, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पवार, शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी, शेख मेहमूद, शेख अख्तर अहेमद यांची प्रमुख उपस्थित होते. स्वागत, सत्कार कार्यक्रमानंतर ही पालखी गांधी चमन परिसराकडे मार्गस्थ झाली. यावेळी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. सय्यद जावेद अली, जब्बार खान, शेख जावेद, शेख निजाम, शेख जब्बार, शेख जमील, अमजद खान, लईक शेख, शेख अजहर, शफी अहेमद आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.आषाढी एकादशिनिमित्त जालना विभागातून १२० जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गुरूवारी रात्री बसस्थानकांत भाविक प्रवाशांची गर्दी होती. त्यांचे हाल होणार नाहीत, यासाठी विभागीय नियंत्रक पी.पी.भुसारी, सांख्यिकी अधिकारी कवसाडीकर, आगारप्रमुख एस.जी.मेहेत्रे, कर्मवर्ग अधिकारी घोडके, उपयंत्र अभियंता गोविंद कबाडे, विभागीय वाहतूक अधिकारी चोथमल हे जालना स्थानकात शुक्रवारी सकाळपासून ठाण मांडून होते. तसेच स्थानक परिसरात प्रवाशांना बसण्यासाठी खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही.पालखी मिरवणुकीदरम्यान भाविकांसाठी ठिकठिकाणी फराळाची व चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विठ्ठल मंदिर रोडवरील माळीपुरा भागात चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी संजय तिडके, गणेश दुरे, मंगेश कराळे, जालिंदर वायाळ, विनोद डोरे, शिवाजी देशमुख, एकनाथ मोटे, दत्ता जगदाने आदींनी सहभाग नोंदवला. १२ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. तसेच कसबा परिसरात १० क्विंटर शाबुदान्याचे वडे भाविकांना देण्यात आले. यासह अनेक ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आली होती.