शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

व्हिजन असलेले नेतृत्व आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:29 IST

श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर आतापर्यंत क्रिकेटऐवजी राजकीय सामनेच अधिक झाले़ मात्र हे स्टेडियम आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे़ तत्कालीन नेतृत्वाने दूरदृष्टी ठेवून या स्टेडियमची उभारणी केली होती़ दूरदृष्टी, व्हिजन असलेले नेतृत्व शहराला आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर आतापर्यंत क्रिकेटऐवजी राजकीय सामनेच अधिक झाले़ मात्र हे स्टेडियम आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे़ तत्कालीन नेतृत्वाने दूरदृष्टी ठेवून या स्टेडियमची उभारणी केली होती़ दूरदृष्टी, व्हिजन असलेले नेतृत्व शहराला आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम क्रिकेट मैदानाचा लोकार्पण सोहळा सोमवारी माजी मुख्यमंत्री खा़ चव्हाण यांच्या हस्ते पार पडला़ यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी जी़श्रीकांत, महापौर शैलजा स्वामी, आ़अमरनाथ राजूरकर, आयुक्त गणेश देशमुख आदींची उपस्थिती होती़ खा़चव्हाण यांनी या मैदानाच्या कामाबाबत आनंद व्यक्त करताना टर्फ विकेट असलेले मराठवाड्यातील हे पहिले मैदान आहे़ या मैदानावर आता क्रिकेट सामने होणे आवश्यक आहे़ आतापर्यंत या मैदानावर क्रिकेटऐवजी राजकीय सामनेच जास्त झाले आहेत़ मात्र यापुढे क्रिकेटचे सामने जास्त व्हावेत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या़ १९७७ मध्ये तत्कालीन नगर परिषदेच्या वतीने या स्टेडियमच्या कामाला सुरुवात केली होती़ त्यानंतर या मैदानाचा मागील २५ वर्षांत चांगला विकास झाला आहे़ दूरदृष्टी ठेवून या मैदानाची स्थापना केली होती़ अशीच दूरदृष्टी शहराच्या विकासासाठीही आवश्यक आहे़ असेही ते म्हणाले़या मैदानावर आता आयपीएल, रणजी तसेच आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकतील़ मात्र याची सुरुवात मराठवाडा प्रीमिअर लीगच्या माध्यमातून व्हावी, असेही ते म्हणाले़महापौर शैलजा स्वामी यांनी नांदेड नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यातील क्रिकेटप्रेमींसाठी हे मैदान उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले़ त्याचवेळी या मैदानावर महिलांचे क्रिकेट सामने व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली़ आ़ राजूरकर यांनी काँग्रेसने मागील निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्यातील काम पूर्ण झाल्याचे सांगितले़ प्रास्ताविकात आयुक्त गणेश देशमुख यांनी मैदानाच्या उभारणीतील टप्प्याबाबत माहिती दिली़ यात स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे विकास झाल्यानंतर येथे रणजी ट्रॉफी, आयपीएल तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ शकतील़ मैदानाचा विकास करण्यासाठी दोन कोटींचा खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली़ पव्हेलियन नूतनीकरण आणि नवीन बांधकामासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले़