शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आठ जिल्ह्यांसाठी व्हिजन-२०२५

By admin | Updated: May 8, 2014 23:52 IST

औरंगाबाद : मराठवाड्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी शासनाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांनी व्हिजन-२०२५ तयार करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज दिल्या.

 औरंगाबाद : मराठवाड्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी शासनाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांनी व्हिजन-२०२५ तयार करावे, तसेच त्याचा उपयोग पुढील १० वर्षांच्या वाटचालीसाठी करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी शासनाच्या विविध प्रादेशिक कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत विभागीय आयुक्त जयस्वाल यांनी वरील सूचना दिल्या. बैठकीला कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार, पोलीस, भूमी अभिलेख, जलसंपदा, महसूल, वने, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आदी विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय कामात गतिशीलता येण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजनबद्ध विकासासाठी व्हिजन-२०२५ तयार करण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. त्यानुसार मराठवाड्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रादेशिक प्रमुखांनी तातडीने कामाला लागावे, तसेच शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा ठसा उमटावा यासाठी डिसेंबर २०१४ अखेर पूर्ण होऊ शकणार्‍या निवडक कामांवर कार्यवाहीही सुरू करावी, असे जयस्वाल यांनी सांगितले. राज्य शासनाने गतिमान प्रशासनाच्या परिणामकारक कार्यवाहीसाठी वेळावेळी शासन निर्णय व परिपत्रकाद्वारे निर्देश दिले. शासनाच्या प्रत्येक विभागीय कार्यालयाने त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्रशासकीय कार्यालयातील सुधारणांच्या विविध बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे. अधिनस्त कार्यालयांनादेखील त्यासाठी कार्यवाही करण्यास सांगावे. नागरिकांची सनद, कार्यालयातील सीसीटीव्ही, लोकप्रतिनिधींच्या पत्रांवरील कार्यवाही, अभिलेख कक्ष, महिला अधिकारी-कर्मचार्‍यांसाठीच्या सुविधा, विशाखा समित्या कार्यक्षम करणे आदींवरही लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. विभागीय आयुक्त दरमहा घेणार आढावा विभागीय आयुक्त जयस्वाल हे यापुढे स्वत: प्रत्येक महिन्याला व्हिजन-२०२५ च्या कामाचा आढावा घेणार आहेत. प्रादेशिक कार्यालयांनी व्हिजन-२०२५ तयार करण्याचे काम वेगाने करावे, तसेच त्यातील काही गोष्टींची अंमलबजावणी चालू वर्ष संपण्यापूर्वीच सुरू करावी, असे आयुक्तांनी सांगितले. त्याचाही आढावा प्रत्येक बैठकीत घेतला जाणार आहे. शासनाची सर्व कार्यालये स्वतंत्र घटक म्हणून काम करत असतात; पण त्यांच्या कामात एकसारखेपणा आणल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. शिवाय व्हिजन असेल तर पुढील वाटचाल गतीने होऊ शकते, म्हणून हा निर्णय घेतला आहे. - संजीव जयस्वाल, विभागीय आयुक्त