शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

विष्णूपुरीचा पाणीसाठा आॅगस्टपर्यंत पुरणार

By admin | Updated: July 4, 2014 00:19 IST

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १० दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला आॅगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरणार आहे़

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १० दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला आॅगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरणार आहे़ त्यामुळे शहरात पाणीटंचाई उदभवणार नाही़ असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांनी केले़ पावसाने डोळे वटारल्याने यंदा दोन नक्षत्र कोरडे गेले़ त्यामुळे लघु, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे़ जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट असले तरी नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णूपुरी प्र्रकल्पातील पाणीसाठा पुढील दोन महिने पुरेल एवढा आहे़ मागील वर्षी १ ते १९ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण २२९०़६३ मि़ मी़ तर १४३़१६ एवढे सरासरी पर्जन्यमान झाले होते़ मात्र यंदा आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण २५़३४ मी़ मी़ पाऊस झाला आहे़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील साठा भरण्याऐवजी कमी होत चालला आहे़ सध्या प्रकल्पात एकूण १३ टक्के साठा आहे़ मागील दोन वर्षापासून अल्पपावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन उन्हाळ्यात दोन, तीन दिवसाआड पाणी सोडावे लागले़ यावर्षी पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता़ जानेवारीपासून एक दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)पाण्याचा अपव्यय टाळावाआयुक्त जी़ श्रीकांत म्हणाले, विष्णूपुरी प्रकल्पात आॅगस्ट अखेरपर्यंत पुरेल एवढा साठा असून जुलै अखेरपर्यंत पाऊस झाल्यास प्रकल्पातील पाणीपातळी वाढेल़ गरज पडली तर दिग्रस बंधाऱ्यातून आरक्षित पाणी घेण्यात येईल़ असे असले तरी नागरिकांनी पाण्याची अपव्यय टाळावा़ बांधकाम किंवा इतर कामासाठी पाण्याचा वापर जपून करावा़ सध्या रमजान हा पवित्र महिना असून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़ जर पाऊस पडला तर दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले़