शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

दिगाव येथील पुलाचे काम निकृष्ट होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:05 IST

सप्टेंबर २०२० मध्ये परिसरात अतिवृष्टी झाल्याने पूर्णा नदीला महापूर आला होता. या पुरात दिगाव येथील नळकांडी पूल पूर्णपणे वाहून ...

सप्टेंबर २०२० मध्ये परिसरात अतिवृष्टी झाल्याने पूर्णा नदीला महापूर आला होता. या पुरात दिगाव येथील नळकांडी पूल पूर्णपणे वाहून गेला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून या विषयाला वाचा फोडल्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले. या कामासाठी ३५ लाख ३८ हजार रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडी हे काम सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच संबंधित ठेकेदाराने निकृष्ट कामाचा सपाटा लावला आहे. नळकांड्या टाकण्यासाठी पाया खोदून काँक्रिटीकरण करणे अपेक्षित होते. मात्र, यासाठी विहिरीच्या निकृष्ट डब्बरचा वापर करून थातूर-मातूर काँक्रिटीकरण करून नळकांड्या टाकण्यात आल्या. तसेच पुलाला लागूनच मातीमिश्रित वाळू काढून तिचा बांधकामात वापर केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कामाकडे सा. बां.च्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदाराने निकृष्ट कामाचा धडाका लावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुलाचे काम चांगल्या प्रतीचे करावे, अशी मागणी दिगावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद काकडे, शिवाजी मुरमुडे, अवचित भुंबरे, बाळू कुंभारे, पोपट मुरमुडे, बाळू सुसुंद्रे, पुंडलिक सुसुंद्रे, धनाजी गवळी, आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.