शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

सप्टेंबरमध्ये गावपुढाऱ्यांच्या निवडी

By admin | Updated: August 27, 2015 00:02 IST

कळंब : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा गुलाल निघतो न निघतो तोच आता सरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने निश्चित केला आहे.

कळंब : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा गुलाल निघतो न निघतो तोच आता सरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने निश्चित केला आहे. तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतच्या ‘कारभाऱ्याची’ आगामी १३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत निवड करण्यात येणार आहे. यासाठी आतापासूनच काही गावात ‘लॉबींग’ सुरु झाल्या आहेत.कळंब तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतीपैकी ५७ ग्रामपंचायतची ४ आॅगस्टला निवडणूक पार पडली होती. ६ आॅगस्टला मतमोजणी होवून निकाल घोषीत करण्यात आला होता. येरमाळा, मंगरुळ यासारख्या मोठ्या व राजकीयदृष्ट्या महत्वाच्या ग्रामपंचायतचा या टप्प्यात समावेश असल्याने अनेक गावात बहुरंगी लढती झाल्या होत्या. ५७ ग्रामपंचायतच्या १८२ प्रभागातील ४८१ सदस्यासाठी पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेतून अनुसूचित जाती प्रवर्गातील ८५, अनुसूचित जमातीमधील २, नागरिकांच्या मागास प्रवर्गातून १२५ तर सर्वसाधारण प्रवर्गातून २६७ सदस्य निवडले गेले होते. विजयी जल्लोषासाठी व पराभवाची कारणे शोधणारी मने स्थिरावतात न स्थिरावतात तोच आता अपेक्षित असा सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबरला भाटशिरपुरा, आडसूळवाडी, आढळा, वाणेवाडी, वडगाव (शि), बारातेवाडी, रायगव्हाण, देवधानोरा, भाटसांगवी, घारगाव ग्रा.पं. च्या १४ सप्टेंबरला ताडगाव, रांजणी, ईटकूर, शिंगोली, चोराखळी, येरमाळा, उमरा, परतापूर, वाकडी (इ), १७ सप्टेंबरला हावरगाव, पाथर्डी, पिंपळगाव (डो), भोगजी, हळदगाव, भोसा, मलकापूर, पानगाव, देवळाली, दूधाळवाडी, लासरा, एकुरका, १८ सप्टेंबर रोजी सापनाई, जायफळ, २१ रोजी कन्हेरवाडी, आथर्डी, मंगरुळ, बहुला, दहिफळ, शेलगाव (दि), उपळाई, बांगरवाडी, माळकरंजा, पाडोळी, गंभीरवाडी, २२ रोजी बरमाचीवाड, पिंप्री (शि), २३ रोजी नायगाव, बोरगाव (ध), २५ रोजी खोंदला, सौंदणा ढोकी व २६ रोजी वडगाव (ज) येथील सरपंचाच्या निवडी होणार आहेत. (वार्ताहर)सरपंच निवडीचा कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत चालणार असून, प्रत्येक ग्रा.पं. साठी स्वतंत्र अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ५७ ग्रा.पं. पैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १४, अनुसूचित जमातीसाठी १, नागरिकांच्या मागास प्रर्गासाठी १० तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३२ ग्रा.पं. चे सरपंचपद आरक्षित झाले आहेत. यातील पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव झाले आहेत. यापैकी ईटकूर, येरमाळा या मोठ्या ग्रा.पं. सर्वसाधारणासाठी तर मंगरुळ, नायगाव, रांजणी, दहिफळ, कन्हेरवाडी, पाडोळी, चोराखळी या ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत.