शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

ग्रामस्वच्छता अभियान कागदोपत्रीच

By admin | Updated: August 9, 2014 00:24 IST

बी.डी.सवडे, अकोलादेव जाफराबाद तालुक्यातील ग्रामस्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले असून, केवळ कागदोपत्रीच हे अभियान राबविले जात आहे. आजही ग्रामीण भागातील

बी.डी.सवडे, अकोलादेवजाफराबाद तालुक्यातील ग्रामस्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले असून, केवळ कागदोपत्रीच हे अभियान राबविले जात आहे. आजही ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये लोक उघड्यावरच शौचास बसताना दिसत आहेत.ग्रामपंचायतस्तरावर सरपंच व ग्रामसेवक मंडळी स्वच्छता अभियानाचा खोटा आव आणून बक्षीसपात्र गावाचे अनुदान लाटण्यासाठी एक प्रकारे शासनाची दिशाभूल करीत आहेत. या बाबीकडे जि.प. व पं.स. प्रशासन डोळेझाक करताना दिसून येत आहे.राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी ग्रामस्वच्छता, तंटामुक्त गाव अभियान सुरू करून गावाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला. या अभियानांतर्गत तालुक्यातील अनेक गावे स्वच्छतामुक्त व तंटामुक्त होऊन राज्य, जिल्हा, तालुका, गावपातळीवर बक्षीसपात्र ठरली. मात्र, यातील काही गावे वगळल्यास बहुतांश गावामध्ये या अभियानाचे बारा वाजल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या तीन चार वर्षात हे अभियान प्रभावीपणे राबविणे सुरू होते. गावा-गावामध्ये या स्वच्छता अभियानावर देखरेख ठेवण्यासाठी गुडमॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली होती. जो कोणी व्यक्ती उघड्यावर शौचास बसेल त्याला शंभर रुपये दंड देण्याची परवानगी देण्यात आली होती. यामध्ये विविध अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला होता.ग्रामीण भागामध्ये सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास फिरणारे पथकही अचानक गायब झाले आहे. कोणत्याच गावामध्ये सध्या हे पथक दिसून येत नाही. जाफराबाद तालुक्यात १०२ गावांचा समावेश आहे. या गावांनी शंभरटक्के गाव दुर्गंधीमुक्त झाल्यास तरच या गावांना पाणीपुरवठ्याचा निधी दिला जाईल, अशी अट सुद्धा शासनाने घातली होती. त्यामुळे अनेक गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रा.पं. सदस्य यांनी गाव दुर्गंधीमुक्त दाखवून शासनाचा निधी गावात आणला होता. परंतु यातील अनेक गावे ही दुर्गंधीमुक्त झालीच नाही. केवळ कागदोपत्री हे अभियान दाखवून निधी उचलण्यात आला. यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचाही हात होता. यावर शासनाने कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही.शासनाने शासनाची कोणतीही योजना घेताना शौचालय असणे बंधनकारक केले होते. तरच त्या व्यक्तीला अनुदान दिले जाईल, असे आदेश असताना सुद्धा या नियमाचे ग्रामीण भागातील किती ग्रामपंचायतींनी पालन केले हा सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत पं.स.चे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना विचारले असता, माझ्या काळामध्ये ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले असून, माझी बदली झाली असली तरी उर्वरित गावांनी गाव दुर्गंधीमुक्त होणे ही काळाची गरज आहे, असे सांगितले.अकोला देवचे ग्रामविकास अधिकारी व्ही.टी. जायभाये म्हणाले की, गावामध्ये जो कोणी शौचालय बांधणार नाही, त्याला शासनाचे कोणतेही अनुदान दिले जाणार नाही, असे ते म्हणाले.