शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

गाव तसे छोटे, जलसंधारणाच्या कामाने झाले मोठे : संडे स्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:05 IST

पाणीदार झालेल्या शाहपूर गावाने केला दुष्काळ हद्दपार रऊफ शेख फुलंब्री : तालुक्यातील लोकसंखेच्या दृष्टीने इवलेसे असलेल्या शाहपूर गावातील नागरिकांनी ...

पाणीदार झालेल्या शाहपूर गावाने केला दुष्काळ हद्दपार

रऊफ शेख

फुलंब्री : तालुक्यातील लोकसंखेच्या दृष्टीने इवलेसे असलेल्या शाहपूर गावातील नागरिकांनी लोकसहभागातून जलसंधारण कामात अफलातून किमया केली आहे. गावकऱ्यांच्या या कष्टाचे चीज म्हणजे गाव पाणीदार झाले असून दुष्काळ कायमचा हद्दपार झाला आहे. या कामाची दखल घेत गावाचा सन्मानही करण्यात आला आहे.

फुलंब्री तालुक्यात शेवटच्या टोकाला असलेले शाहपूर या छोट्याशा गावची लोकसंख्या पाचशेच्या आसपास आहे. या गावाच्या जमिनीचे क्षेत्र ३५७ हेक्टर असून यातील ६९ टक्के जमीन जिरायती आहे. तर केवळ ३१ टक्केच जमीन हंगामी बागायती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले होते. पावसाळ्यात फार कमी पाऊस पडल्याने गावानजीकचे पाझर तलाव कोरडे पडत होते. विहिरींनाही पाणी राहत नव्हते. २०१६ पासून सलग चार वर्ष टँकरच्या पाण्यावर गावाची तहान भागत होती. गाव परिसरात असलेल्या नदी व नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण करून पाणी अडविले गेले तर, येणाऱ्या काळात पाणी साठवण करता येईल. व पाणीटंचाई निवारणास मदत होईल, असा विचार करून ग्रामस्थांनी २६ डिसेंबर २०१९ रोजी एकत्र येत गावासाठी आपणच काहीतरी करायचे हा निश्चय केला. तसेच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेण्याची प्रतिज्ञा केली. ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी पुढाकार घेतला. यात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

चौकट

पाणी फाउंडेशनचा मिळाला पुरस्कार

तालुक्यात पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत हे पाचवे वर्ष आहे. २०१९ मध्ये शाहपूर गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदवित दीडशे हेक्टर क्षेत्रात जलसंधारणाची कामे केली. या कामाचे मूल्यमापन झाल्यानंतर या गावाला वाॅटर कप स्पर्धेचा तालुक्याचा पहिला पुरस्कार मिळाला. पुरस्कारापेक्षाही गाव पाणीदार होऊन टँकरमुक्त झाल्याचा आनंद गावातील नागरिकांना आहे.

चौकट

सुरुवातीला मिळाला कमी प्रतिसाद

गावाचा कायापालट करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रशिक्षणामध्ये भाग घेऊन गावकऱ्यांनी कामाला प्रारंभ केला. सुरुवातीला काही जणच कामाला येत असत. पण नंतर ज्येष्ठांनी नागरिकांना समजावून सांगितल्यानंतर हेवेदावे राजकीय मतभेद बाजूला सारुन गावकरी येऊ लागले. दुष्काळ निर्मूलनासाठी प्रत्येकाला जबाबदारी सोपवून देण्यात आली. यानंतर माथा ते पायथ्यापर्यंत श्रमदानातून सीसीटी, बांध बंदिस्ती, मातीनाला बांध, शेततळे, डीप सीसीटीसारखी कामे करण्यात आली आहे. लगतच्या डोंगरावर केलेल्या या कामाचा फायदा सिंचनासाठी होत आहे.

फोटो :