शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

गाव तसे छोटे, जलसंधारणाच्या कामाने झाले मोठे : संडे स्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:05 IST

पाणीदार झालेल्या शाहपूर गावाने केला दुष्काळ हद्दपार रऊफ शेख फुलंब्री : तालुक्यातील लोकसंखेच्या दृष्टीने इवलेसे असलेल्या शाहपूर गावातील नागरिकांनी ...

पाणीदार झालेल्या शाहपूर गावाने केला दुष्काळ हद्दपार

रऊफ शेख

फुलंब्री : तालुक्यातील लोकसंखेच्या दृष्टीने इवलेसे असलेल्या शाहपूर गावातील नागरिकांनी लोकसहभागातून जलसंधारण कामात अफलातून किमया केली आहे. गावकऱ्यांच्या या कष्टाचे चीज म्हणजे गाव पाणीदार झाले असून दुष्काळ कायमचा हद्दपार झाला आहे. या कामाची दखल घेत गावाचा सन्मानही करण्यात आला आहे.

फुलंब्री तालुक्यात शेवटच्या टोकाला असलेले शाहपूर या छोट्याशा गावची लोकसंख्या पाचशेच्या आसपास आहे. या गावाच्या जमिनीचे क्षेत्र ३५७ हेक्टर असून यातील ६९ टक्के जमीन जिरायती आहे. तर केवळ ३१ टक्केच जमीन हंगामी बागायती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले होते. पावसाळ्यात फार कमी पाऊस पडल्याने गावानजीकचे पाझर तलाव कोरडे पडत होते. विहिरींनाही पाणी राहत नव्हते. २०१६ पासून सलग चार वर्ष टँकरच्या पाण्यावर गावाची तहान भागत होती. गाव परिसरात असलेल्या नदी व नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण करून पाणी अडविले गेले तर, येणाऱ्या काळात पाणी साठवण करता येईल. व पाणीटंचाई निवारणास मदत होईल, असा विचार करून ग्रामस्थांनी २६ डिसेंबर २०१९ रोजी एकत्र येत गावासाठी आपणच काहीतरी करायचे हा निश्चय केला. तसेच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेण्याची प्रतिज्ञा केली. ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी पुढाकार घेतला. यात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

चौकट

पाणी फाउंडेशनचा मिळाला पुरस्कार

तालुक्यात पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत हे पाचवे वर्ष आहे. २०१९ मध्ये शाहपूर गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदवित दीडशे हेक्टर क्षेत्रात जलसंधारणाची कामे केली. या कामाचे मूल्यमापन झाल्यानंतर या गावाला वाॅटर कप स्पर्धेचा तालुक्याचा पहिला पुरस्कार मिळाला. पुरस्कारापेक्षाही गाव पाणीदार होऊन टँकरमुक्त झाल्याचा आनंद गावातील नागरिकांना आहे.

चौकट

सुरुवातीला मिळाला कमी प्रतिसाद

गावाचा कायापालट करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रशिक्षणामध्ये भाग घेऊन गावकऱ्यांनी कामाला प्रारंभ केला. सुरुवातीला काही जणच कामाला येत असत. पण नंतर ज्येष्ठांनी नागरिकांना समजावून सांगितल्यानंतर हेवेदावे राजकीय मतभेद बाजूला सारुन गावकरी येऊ लागले. दुष्काळ निर्मूलनासाठी प्रत्येकाला जबाबदारी सोपवून देण्यात आली. यानंतर माथा ते पायथ्यापर्यंत श्रमदानातून सीसीटी, बांध बंदिस्ती, मातीनाला बांध, शेततळे, डीप सीसीटीसारखी कामे करण्यात आली आहे. लगतच्या डोंगरावर केलेल्या या कामाचा फायदा सिंचनासाठी होत आहे.

फोटो :