शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

गाव तसे छोटे, जलसंधारणाच्या कामाने झाले मोठे : संडे स्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:05 IST

पाणीदार झालेल्या शाहपूर गावाने केला दुष्काळ हद्दपार रऊफ शेख फुलंब्री : तालुक्यातील लोकसंखेच्या दृष्टीने इवलेसे असलेल्या शाहपूर गावातील नागरिकांनी ...

पाणीदार झालेल्या शाहपूर गावाने केला दुष्काळ हद्दपार

रऊफ शेख

फुलंब्री : तालुक्यातील लोकसंखेच्या दृष्टीने इवलेसे असलेल्या शाहपूर गावातील नागरिकांनी लोकसहभागातून जलसंधारण कामात अफलातून किमया केली आहे. गावकऱ्यांच्या या कष्टाचे चीज म्हणजे गाव पाणीदार झाले असून दुष्काळ कायमचा हद्दपार झाला आहे. या कामाची दखल घेत गावाचा सन्मानही करण्यात आला आहे.

फुलंब्री तालुक्यात शेवटच्या टोकाला असलेले शाहपूर या छोट्याशा गावची लोकसंख्या पाचशेच्या आसपास आहे. या गावाच्या जमिनीचे क्षेत्र ३५७ हेक्टर असून यातील ६९ टक्के जमीन जिरायती आहे. तर केवळ ३१ टक्केच जमीन हंगामी बागायती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले होते. पावसाळ्यात फार कमी पाऊस पडल्याने गावानजीकचे पाझर तलाव कोरडे पडत होते. विहिरींनाही पाणी राहत नव्हते. २०१६ पासून सलग चार वर्ष टँकरच्या पाण्यावर गावाची तहान भागत होती. गाव परिसरात असलेल्या नदी व नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण करून पाणी अडविले गेले तर, येणाऱ्या काळात पाणी साठवण करता येईल. व पाणीटंचाई निवारणास मदत होईल, असा विचार करून ग्रामस्थांनी २६ डिसेंबर २०१९ रोजी एकत्र येत गावासाठी आपणच काहीतरी करायचे हा निश्चय केला. तसेच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेण्याची प्रतिज्ञा केली. ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी पुढाकार घेतला. यात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

चौकट

पाणी फाउंडेशनचा मिळाला पुरस्कार

तालुक्यात पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत हे पाचवे वर्ष आहे. २०१९ मध्ये शाहपूर गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदवित दीडशे हेक्टर क्षेत्रात जलसंधारणाची कामे केली. या कामाचे मूल्यमापन झाल्यानंतर या गावाला वाॅटर कप स्पर्धेचा तालुक्याचा पहिला पुरस्कार मिळाला. पुरस्कारापेक्षाही गाव पाणीदार होऊन टँकरमुक्त झाल्याचा आनंद गावातील नागरिकांना आहे.

चौकट

सुरुवातीला मिळाला कमी प्रतिसाद

गावाचा कायापालट करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रशिक्षणामध्ये भाग घेऊन गावकऱ्यांनी कामाला प्रारंभ केला. सुरुवातीला काही जणच कामाला येत असत. पण नंतर ज्येष्ठांनी नागरिकांना समजावून सांगितल्यानंतर हेवेदावे राजकीय मतभेद बाजूला सारुन गावकरी येऊ लागले. दुष्काळ निर्मूलनासाठी प्रत्येकाला जबाबदारी सोपवून देण्यात आली. यानंतर माथा ते पायथ्यापर्यंत श्रमदानातून सीसीटी, बांध बंदिस्ती, मातीनाला बांध, शेततळे, डीप सीसीटीसारखी कामे करण्यात आली आहे. लगतच्या डोंगरावर केलेल्या या कामाचा फायदा सिंचनासाठी होत आहे.

फोटो :