शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

गाव तसे छोटे, जलसंधारणाच्या कामाने झाले मोठे : संडे स्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:05 IST

पाणीदार झालेल्या शाहपूर गावाने केला दुष्काळ हद्दपार रऊफ शेख फुलंब्री : तालुक्यातील लोकसंखेच्या दृष्टीने इवलेसे असलेल्या शाहपूर गावातील नागरिकांनी ...

पाणीदार झालेल्या शाहपूर गावाने केला दुष्काळ हद्दपार

रऊफ शेख

फुलंब्री : तालुक्यातील लोकसंखेच्या दृष्टीने इवलेसे असलेल्या शाहपूर गावातील नागरिकांनी लोकसहभागातून जलसंधारण कामात अफलातून किमया केली आहे. गावकऱ्यांच्या या कष्टाचे चीज म्हणजे गाव पाणीदार झाले असून दुष्काळ कायमचा हद्दपार झाला आहे. या कामाची दखल घेत गावाचा सन्मानही करण्यात आला आहे.

फुलंब्री तालुक्यात शेवटच्या टोकाला असलेले शाहपूर या छोट्याशा गावची लोकसंख्या पाचशेच्या आसपास आहे. या गावाच्या जमिनीचे क्षेत्र ३५७ हेक्टर असून यातील ६९ टक्के जमीन जिरायती आहे. तर केवळ ३१ टक्केच जमीन हंगामी बागायती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले होते. पावसाळ्यात फार कमी पाऊस पडल्याने गावानजीकचे पाझर तलाव कोरडे पडत होते. विहिरींनाही पाणी राहत नव्हते. २०१६ पासून सलग चार वर्ष टँकरच्या पाण्यावर गावाची तहान भागत होती. गाव परिसरात असलेल्या नदी व नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण करून पाणी अडविले गेले तर, येणाऱ्या काळात पाणी साठवण करता येईल. व पाणीटंचाई निवारणास मदत होईल, असा विचार करून ग्रामस्थांनी २६ डिसेंबर २०१९ रोजी एकत्र येत गावासाठी आपणच काहीतरी करायचे हा निश्चय केला. तसेच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेण्याची प्रतिज्ञा केली. ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी पुढाकार घेतला. यात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

चौकट

पाणी फाउंडेशनचा मिळाला पुरस्कार

तालुक्यात पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत हे पाचवे वर्ष आहे. २०१९ मध्ये शाहपूर गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदवित दीडशे हेक्टर क्षेत्रात जलसंधारणाची कामे केली. या कामाचे मूल्यमापन झाल्यानंतर या गावाला वाॅटर कप स्पर्धेचा तालुक्याचा पहिला पुरस्कार मिळाला. पुरस्कारापेक्षाही गाव पाणीदार होऊन टँकरमुक्त झाल्याचा आनंद गावातील नागरिकांना आहे.

चौकट

सुरुवातीला मिळाला कमी प्रतिसाद

गावाचा कायापालट करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रशिक्षणामध्ये भाग घेऊन गावकऱ्यांनी कामाला प्रारंभ केला. सुरुवातीला काही जणच कामाला येत असत. पण नंतर ज्येष्ठांनी नागरिकांना समजावून सांगितल्यानंतर हेवेदावे राजकीय मतभेद बाजूला सारुन गावकरी येऊ लागले. दुष्काळ निर्मूलनासाठी प्रत्येकाला जबाबदारी सोपवून देण्यात आली. यानंतर माथा ते पायथ्यापर्यंत श्रमदानातून सीसीटी, बांध बंदिस्ती, मातीनाला बांध, शेततळे, डीप सीसीटीसारखी कामे करण्यात आली आहे. लगतच्या डोंगरावर केलेल्या या कामाचा फायदा सिंचनासाठी होत आहे.

फोटो :