शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: September 26, 2016 00:11 IST

लातूर : लातूरसाठी वरदान ठरलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरत आले आहे. रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत जवळपास ९० टक्के धरणात पाणीसाठा झाला आहे

लातूर : लातूरसाठी वरदान ठरलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरत आले आहे. रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत जवळपास ९० टक्के धरणात पाणीसाठा झाला आहे. पाण्याचा ओघ धरणात सुरूच असून, रात्री कोणत्याही क्षणी मांजरा धरणाची दारे उघडण्याची दाट शक्यता असल्याने नदीकाठच्या ५३ गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सतर्कतेचे आदेश बजावले आहेत. याशिवाय, तावरजा नदीकाठच्या गावांनाही सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात ९० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर निम्न तेरणा प्रकल्पात ३५.०७ टक्के पाणीसाठा झाला असून, जिल्ह्यात इतर मध्यम व लघु प्रकल्प तुडूंब भरले आहेत. तावरजा प्रकल्पात ८२ टक्के, रेणा ८६.५० टक्के, व्हटी १०० टक्के, तिरु ११६.६८ टक्के, देवर्जन १०० टक्के, साकोळ १०० टक्के, घरणी १०० टक्के, मसलगा ८२.२३ टक्के पाणीसाठा झाला आहे. अशा एकूण आठ मध्यम प्रकल्पांमध्ये ९४.३० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर १३२ लघु प्रकल्पांमध्ये २६८.३३ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील १४२ प्रकल्पांमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत १५४.२४ टक्के पाणीसाठा झाला आहे. बहुतांश मोठे, मध्यम व लघु प्रकल्पही भरले असल्याने प्रकल्पाशेजारील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत २०११-१२ ला मांजरा प्रकल्प १०० टक्के भरला होता. त्यानंतर मात्र परिसरातील गावांना टंचाईला सामोरे जावे लागले. यावर्षीही तीच परिस्थिती राहील, अशी शक्यता जलतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती. २०१६ मध्ये आठवडाभर पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे २५ सप्टेंबरपर्यंत मांजरा प्रकल्पामध्ये १६७ दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये ४७.१३ टक्के मृतसाठा तर ११९.९४० दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे तीन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापपर्यंत झाला असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)