शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:32 IST

नाशिक व वरील भागांतील धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिला तर गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात २९ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, तसेच नाशिक व वरील भागांतील धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिला तर गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी झाडाच्या आडोशाला न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. अतिवृष्टीच्या काळात पाण्याची आवक वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावरून पाणी जात असल्यास त्यावरून वाहन नेऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.दरम्यान, जायकवाडी धरणावरील सर्व २२ धरणे पंधरा दिवसांपूर्वीच ९० टक्क्यांच्या पुढे सरकली आहेत. जीओएस (गेट आॅपरेटिंग सिस्टीम) प्रणालीनुसार कोणतेही मोठे धरण १०० टक्के भरता येत नाही. कारण जर मोठा पाऊस झाला व त्यामुळे सर्व धरणांतील पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली, तर महापूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. महापुरामुळे नदीकाठच्या शेती, मालमत्तेसह जीवित हानी होऊ शकते. हे टाळण्यासाठीच धरणे पूर्ण भरण्यास बंधने आहेत. असे असताना वरील सर्व धरणांत पाणी साठविले आहे. अहमदनगर, नाशिक विभागातील धरणे भरत आल्यामुळे गोदावरीला पुराचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे.गुन्हा दाखल करण्याचा इशाराजीओएसचे नियम न पाळल्यामुळे २००६ मध्ये वरील धरणांतून अचानक पाणी सोडल्यामुळे पैठणला पूर आला होता. नाशिक ते नांदेड या मार्गातील सर्व गावांचे मोठे नुकसान झाले होते. पुरामुळे नुकसान झाल्यास संबधितांवर शेतकरी संघटनेमार्फत गुन्हे दाखल करण्याचा इशारा जयाजी सूर्यवंशी यांनी दिला आहे.