शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:32 IST

नाशिक व वरील भागांतील धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिला तर गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात २९ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, तसेच नाशिक व वरील भागांतील धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिला तर गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी झाडाच्या आडोशाला न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. अतिवृष्टीच्या काळात पाण्याची आवक वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावरून पाणी जात असल्यास त्यावरून वाहन नेऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.दरम्यान, जायकवाडी धरणावरील सर्व २२ धरणे पंधरा दिवसांपूर्वीच ९० टक्क्यांच्या पुढे सरकली आहेत. जीओएस (गेट आॅपरेटिंग सिस्टीम) प्रणालीनुसार कोणतेही मोठे धरण १०० टक्के भरता येत नाही. कारण जर मोठा पाऊस झाला व त्यामुळे सर्व धरणांतील पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली, तर महापूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. महापुरामुळे नदीकाठच्या शेती, मालमत्तेसह जीवित हानी होऊ शकते. हे टाळण्यासाठीच धरणे पूर्ण भरण्यास बंधने आहेत. असे असताना वरील सर्व धरणांत पाणी साठविले आहे. अहमदनगर, नाशिक विभागातील धरणे भरत आल्यामुळे गोदावरीला पुराचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे.गुन्हा दाखल करण्याचा इशाराजीओएसचे नियम न पाळल्यामुळे २००६ मध्ये वरील धरणांतून अचानक पाणी सोडल्यामुळे पैठणला पूर आला होता. नाशिक ते नांदेड या मार्गातील सर्व गावांचे मोठे नुकसान झाले होते. पुरामुळे नुकसान झाल्यास संबधितांवर शेतकरी संघटनेमार्फत गुन्हे दाखल करण्याचा इशारा जयाजी सूर्यवंशी यांनी दिला आहे.