शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:32 IST

नाशिक व वरील भागांतील धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिला तर गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात २९ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, तसेच नाशिक व वरील भागांतील धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिला तर गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी झाडाच्या आडोशाला न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. अतिवृष्टीच्या काळात पाण्याची आवक वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावरून पाणी जात असल्यास त्यावरून वाहन नेऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.दरम्यान, जायकवाडी धरणावरील सर्व २२ धरणे पंधरा दिवसांपूर्वीच ९० टक्क्यांच्या पुढे सरकली आहेत. जीओएस (गेट आॅपरेटिंग सिस्टीम) प्रणालीनुसार कोणतेही मोठे धरण १०० टक्के भरता येत नाही. कारण जर मोठा पाऊस झाला व त्यामुळे सर्व धरणांतील पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली, तर महापूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. महापुरामुळे नदीकाठच्या शेती, मालमत्तेसह जीवित हानी होऊ शकते. हे टाळण्यासाठीच धरणे पूर्ण भरण्यास बंधने आहेत. असे असताना वरील सर्व धरणांत पाणी साठविले आहे. अहमदनगर, नाशिक विभागातील धरणे भरत आल्यामुळे गोदावरीला पुराचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे.गुन्हा दाखल करण्याचा इशाराजीओएसचे नियम न पाळल्यामुळे २००६ मध्ये वरील धरणांतून अचानक पाणी सोडल्यामुळे पैठणला पूर आला होता. नाशिक ते नांदेड या मार्गातील सर्व गावांचे मोठे नुकसान झाले होते. पुरामुळे नुकसान झाल्यास संबधितांवर शेतकरी संघटनेमार्फत गुन्हे दाखल करण्याचा इशारा जयाजी सूर्यवंशी यांनी दिला आहे.