शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

वेताळवाडी : निसर्ग सौंदर्याने नटलेला दुर्लक्षित किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:02 IST

मराठवाडा आणि खान्देश यांना विभागणाऱ्या अजिंठा डोंगररांगांत अत्यंत लक्षवेधी असा वेताळवाडीचा किल्ला आहे. या किल्ल्याला स्थानिक लोक वसईचा किल्ला ...

मराठवाडा आणि खान्देश यांना विभागणाऱ्या अजिंठा डोंगररांगांत अत्यंत लक्षवेधी असा वेताळवाडीचा किल्ला आहे. या किल्ल्याला स्थानिक लोक वसईचा किल्ला किंवा वाडी किल्लासुद्धा म्हणतात. हळदा घाटातील तिन्ही दिशेने डोंगर रांगांनी हा किल्ला वेढलेला आहे. सध्या या किल्ल्याची तटबंदी आणि दोन भव्य दरवाजे, आतील जलमहाल चांगल्या स्थितीत आहेत. अजिंठा डोंगररांगांमध्ये पर्यटन करताना तितकासा प्रसिद्ध नसला तरी दुरून पाहिल्यावर या किल्ल्याकडे जाण्याचा मोह नक्कीच होतो.

काय पाहाल -

किल्ल्याची संपूर्ण तटबंदी दुरूनच दिसते आणि त्याची भव्यता लक्षात येते. आत गेल्यास भव्य भक्कम बुरूज पहिल्यांदा आपले लक्ष वेधून घेतो. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार तीन बुरुजांच्या त्रिकोणी रचनेतून तयार झालेले आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार, द्वारपालाचे दालन, मुख्य बुरुजावर टेहेळणीसाठीचे ठिकाण यावरून किल्ल्याची कल्पक स्थापत्यशैली दिसून येते. पुढे धान्य साठवणुकीचे दोन भव्य दालन आहेत. दगडी चिऱ्याचे अष्टकोनी बांधीव तळे आहे. त्याच्या एका बाजूला ‘जलमहाल’ आहे. पुढे ‘हवामहाल’चे अवशेष आढळून येतात. यावरून किल्ल्याची तत्कालीन समृद्धी लक्षात येते. किल्ल्यावर एक तोफसुद्धा आहे. किल्ल्याच्या उजव्या बाजूस असलेली प्रसिद्ध रुद्रेश्वर लेणी आणि आकर्षक धबधबा दिसून येतो. दूरवर पसरलेली तटबंदी, नागमोडी हळदा घाट आणि वेताळवाडी धरणाचा नजारा अनुभवायला मिळतो. पावसाळ्यात या किल्ल्यावरील निसर्गरम्य वातावरण मोहीत करते.

कसे जाल -

औरंगाबादपासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे. सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहून १२ किमीवर हळदा घाटात ३ किमी अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. तसेच फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव आहे. येथून वेताळवाडी अंतर ४ किमी आहे.