शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती

By admin | Updated: March 30, 2016 00:49 IST

एकीकडे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागते, तर दुसरीकडे शहरासह तालुक्यात इमारतीच्या

एकीकडे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागते, तर दुसरीकडे शहरासह तालुक्यात इमारतीच्या बांधकामावर लाखो लिटर सर्वाधिक टंचाई असतानाही ५० बांधकामेपाण्याची दुष्काळात उधळपट्टी होत आहे. आष्टी तालुक्यातील नागरिक गेल्या पाच वर्षांपासून पाणी टंचाईशी मुकाबला करीत आहेत. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने ११० छावण्या सुरू आहेत. तालुक्यातील १७२ गावांपैकी तब्बल ११९ गावे व ९१ वाड्या-वस्त्या तहानलेल्या आहेत. आष्टी शहरासह लगतच्या मुर्शदपूर, कडा, धानोरा, धामणगाव परिसरात घरे, इमारतींची बांधकामे जोमाने सुरू आहेत. मार्चअखेरमुळे शासकीय कामे करणाऱ्या गुत्तेदारांनी बिले काढण्यासाठी रस्ते व इमारतीच्या कामांचा सपाटा सुरू केला असून, आजघडीला आष्टी व मुर्शदपूर भागात एकूण ५० च्या वर बांधकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या परवानगीविनाच ही बांधकामे सुरू आहेत. आजघडीला तालुक्यातील एकूण बांधकामावर दररोज एक लाख लिटर पाण्याची उधळपट्टी होत आहे. तालुक्यातील पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन सुरू असलेली बांधकामे तात्काळ बंद करणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.