शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

हिंगोली शहरातून वाहने सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:10 IST

शहरात बेशिस्त पद्धतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाºया वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. शिवाय अनेकदा अपघाताच्या किरकोळ घटनांही घडतात. वाहतूक शाखेतर्फे कारवाई करूनही याला आळा बसत नसून शहरातून सुसाटपणे दुचाकीस्वार धावताना दिसतात. तसेच वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरात बेशिस्त पद्धतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाºया वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. शिवाय अनेकदा अपघाताच्या किरकोळ घटनांही घडतात. वाहतूक शाखेतर्फे कारवाई करूनही याला आळा बसत नसून शहरातून सुसाटपणे दुचाकीस्वार धावताना दिसतात. तसेच वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.हिंगोली शहरातील गांधी चौक, जवाहर रोड, बसस्थानक आदी गर्दीच्या ठिकाणी ये-जा करणाºया वाहनांची नेहमी वर्दळ असते. पालिकेतर्फे मुख्य चौका-चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आले असले तरी ते सुरळीत होण्यापूर्वीच बंद पडले. लाखो रूपये खर्च करून सिग्नल बसविण्यात आले होते. मात्र दुरूस्तीअभावी सिग्नल बंदावस्थेतच आहेत. सुविधा असूनही सिग्नलचा उपयोग नाही. शिवाय संबंधित विभाग याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या सुट्या संपताच शाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील वाहतूक शिस्तीत आणून नियोजन करणे गरजेचे आहे.शहरातील विविध शाळा मुख्य मार्गावर आहेत. शाळा सुटल्यानंतर याच रस्त्याने विद्यार्थी ये-जा करतात. भरधाव वाहने या विद्यार्थ्यांसाठी थांबायलाच तयार नसतात. त्यामुळे अपघाताचा धोका कायम राहतो. ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यात वाहनांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी तरी वाहतुकीला शिस्त लावणे गरजेचे आहेवाहतूक शाखेतर्फे मोहीम- वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम वाहतूक शाखेतर्फे केले जाते. शिवाय दरदिवशी मोहीम राबवून पोलिसांकडून कारवाई केली जाते. मोहीम राबविण्यासाठी चौका-चौकात पोलीस उभे असतात. परंतु दंड व कारवाई यापलिकडे वाहतुकीला शिस्त लागणे तितकेच महत्त्वाचे आहे. चालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.