शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

वाहनांच्या वेगमर्यादेचे फलक फक्त नावापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : विविध रस्त्यांवर वाहनाची वेगमर्यादा किती असावी, असे फलक पाहायला मिळतात. मात्र, वाहनचालक हे फलक वाचत नसून सर्रास ...

औरंगाबाद : विविध रस्त्यांवर वाहनाची वेगमर्यादा किती असावी, असे फलक पाहायला मिळतात. मात्र, वाहनचालक हे फलक वाचत नसून सर्रास वेगमर्यादेचे उल्लंघन केले जाते. वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर ‘स्पीड गण’ यंत्राद्वारे वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते.

पोलिसांकडून होणारी कारवाई टाळायची असेल, तर वाहनधारकांना बीड बायपासवर ताशी ३० किमी आणि जालना रोडवर ४० किमी वेगमर्यादा पाळावी लागेल. दरवर्षी सुसाट वाहनांमुळे प्राणांतिक अपघातात अनेक वाहनचालकांचे बळी जातात. हे अपघात रोखण्यासाठी शासनाने वाहनांच्या वेगमर्यादा नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन २०१७ साली अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी एक परिपत्रक जारी केले. यासोबतच वेगमर्यादेचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक शहराला दोन ‘स्पीड गण’ मशीन, तर महामार्ग पोलिसांनाही अशी यंत्रे देण्यात आली आहेत.

मनपा हद्दीतील जळगाव रोड, व्हीआयपी रोड, जालना रोड, सोलापूर-धुळे महामार्ग आदी रस्त्यांवर ९ आसन क्षमतेपर्यंत चारचाकी वाहनांसाठी ७० किलोमीटर प्रती तास, तर ९ किंवा जास्त आसन क्षमतेच्या वाहनांसाठी ताशी ६० किमी अशी वेगमर्यादा आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकरिता ६० किमी प्रती तास वेगमर्यादा ठरविण्यात आली आहे. दुचाकी मोटारसायकल, मोपेड आदी वाहनांकरीता ताशी ६० किमी, तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन चाकी रिक्षा, लोडिंग रिक्षा प्रती तास ५० किमी अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली.

------------------------

दोनच रस्त्यांवर कारवाई, अन्य मार्गावर मात्र वाहने सुसाट

वाहनांची गती मोजण्यासाठी औरंगााबाद पोलीस विभागाकडे असलेल्या दोन ‘स्पीड गण’ यंत्रापैकी एक वाळूज रोडवर आणि दुसरे बायपासवर नजर ठेवून आहे. मात्र, अन्य रस्त्यांवर सुसाट वाहनचालक मोकाटच आहेत.

-----------------------

चौकट

वेगमर्यादा कमी केल्याने अपघात घटले

बीड बायपासवर गतवर्षी अपघाताची मालिका रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी विशेष अधीसूचना काढून बायपासवरील वाहनांची वेगमर्यादा ताशी ३० किमी अशी केली होती. या वेगमर्यादेमुळे बायपासवरील अपघात कमी झाले आहेत.

--------------------------------

वाहतूक विभागाकडे दोन स्पीड गण यंत्रे (इंटरसेप्टर) यंत्रे आहेत. ही यंत्रे वेगवेगळ्या रस्त्यावर नेऊन वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.- सुरेश वानखेडे, एसीपी, वाहतूक विभाग