शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या वेगमर्यादेचे फलक फक्त नावापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : विविध रस्त्यांवर वाहनाची वेगमर्यादा किती असावी, असे फलक पाहायला मिळतात. मात्र, वाहनचालक हे फलक वाचत नसून सर्रास ...

औरंगाबाद : विविध रस्त्यांवर वाहनाची वेगमर्यादा किती असावी, असे फलक पाहायला मिळतात. मात्र, वाहनचालक हे फलक वाचत नसून सर्रास वेगमर्यादेचे उल्लंघन केले जाते. वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर ‘स्पीड गण’ यंत्राद्वारे वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते.

पोलिसांकडून होणारी कारवाई टाळायची असेल, तर वाहनधारकांना बीड बायपासवर ताशी ३० किमी आणि जालना रोडवर ४० किमी वेगमर्यादा पाळावी लागेल. दरवर्षी सुसाट वाहनांमुळे प्राणांतिक अपघातात अनेक वाहनचालकांचे बळी जातात. हे अपघात रोखण्यासाठी शासनाने वाहनांच्या वेगमर्यादा नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन २०१७ साली अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी एक परिपत्रक जारी केले. यासोबतच वेगमर्यादेचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक शहराला दोन ‘स्पीड गण’ मशीन, तर महामार्ग पोलिसांनाही अशी यंत्रे देण्यात आली आहेत.

मनपा हद्दीतील जळगाव रोड, व्हीआयपी रोड, जालना रोड, सोलापूर-धुळे महामार्ग आदी रस्त्यांवर ९ आसन क्षमतेपर्यंत चारचाकी वाहनांसाठी ७० किलोमीटर प्रती तास, तर ९ किंवा जास्त आसन क्षमतेच्या वाहनांसाठी ताशी ६० किमी अशी वेगमर्यादा आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकरिता ६० किमी प्रती तास वेगमर्यादा ठरविण्यात आली आहे. दुचाकी मोटारसायकल, मोपेड आदी वाहनांकरीता ताशी ६० किमी, तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन चाकी रिक्षा, लोडिंग रिक्षा प्रती तास ५० किमी अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली.

------------------------

दोनच रस्त्यांवर कारवाई, अन्य मार्गावर मात्र वाहने सुसाट

वाहनांची गती मोजण्यासाठी औरंगााबाद पोलीस विभागाकडे असलेल्या दोन ‘स्पीड गण’ यंत्रापैकी एक वाळूज रोडवर आणि दुसरे बायपासवर नजर ठेवून आहे. मात्र, अन्य रस्त्यांवर सुसाट वाहनचालक मोकाटच आहेत.

-----------------------

चौकट

वेगमर्यादा कमी केल्याने अपघात घटले

बीड बायपासवर गतवर्षी अपघाताची मालिका रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी विशेष अधीसूचना काढून बायपासवरील वाहनांची वेगमर्यादा ताशी ३० किमी अशी केली होती. या वेगमर्यादेमुळे बायपासवरील अपघात कमी झाले आहेत.

--------------------------------

वाहतूक विभागाकडे दोन स्पीड गण यंत्रे (इंटरसेप्टर) यंत्रे आहेत. ही यंत्रे वेगवेगळ्या रस्त्यावर नेऊन वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.- सुरेश वानखेडे, एसीपी, वाहतूक विभाग