शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

जिल्ह्यात वाहन वितरणाची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाला रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. याचा जसा सर्व व्यवसाय व उद्योगावर परिणाम झाला आहे, ...

औरंगाबाद : कोरोनाला रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. याचा जसा सर्व व्यवसाय व उद्योगावर परिणाम झाला आहे, तेवढाच गंभीर परिणाम वाहन उद्योगावर झाला आहे. कंपन्यांत उत्पादन सुरू आहे; पण वाहने विक्री होत नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर कंपन्या आपले उत्पादन कमी करतील. अंतिमतः याचा फटका अर्थव्यवस्थेला बसेल.

जिल्ह्यात वाहन वितरकांची ६० शोरूम्स आहेत. महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्हा वाहन यात दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक वाहन विक्रीत आघाडीवर आहे. मात्र, दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे शोरूम बंद आहेत. परिणामी वाहन उद्योगाची आर्थिक गती थांबली आहे. याचा फटका ६० वाहन वितरक, त्यांच्यावर अवलंबून सुमारे ६५०० कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाला बसला आहे.

एवढेच नव्हे, तर राज्य सरकारचा व केंद्र सरकारच्या महसूल वसुलीत मोठी घट झाली आहे. संपूर्ण अर्थचक्राला हा धक्का आहे. त्यात आता चेन्नई येथे ७ जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. कार उत्पादनातील काही कंपन्यांचे उत्पादन तिथे होते ते बंद झाले आहे. याचाही परिणाम देशभरात जाणवत आहे. शोरूम सुरू झाले तर थांबलेले अर्थचक्र सुरू होईल. गणेशोत्सवापासून गती येईल; पण त्यासाठी १ जूनपासून शोरूम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी माहिती वाहन वितरकांनी दिली.

चौकट

१२ हजार दुचाकी, १८०० कारची विक्री थांबली

एप्रिल व मे या महिन्यांत जिल्ह्यात १२ हजार दुचाकी व १८०० कारची विक्री होत असते; पण लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका वाहन उद्योगाला बसला आहे. जिल्ह्यात ६० शोरूम आहेत. त्यात ६५०० कर्मचारी आहेत. या सर्वांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. लॉकडाऊन आणखी लांबला तर उत्पादन कंपन्याही बंद पडू शकतात. याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

राहुल पगारिया, संचालक पगारिया ऑटो

---

कोरोना रुग्णसंख्या कमी झाली

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. यामुळे आता शोरूम उघडण्यास परवानगी द्यावी. तसेही कार खरेदीसाठी शोरूममध्ये दिवसभरात ८ ते १० ग्राहक येतात. सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत शोरूम सुरू ठेवता आली असती. जर शोरूम उघडे असते तर अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला नसता.

मनीष धूत

संचालक, धूत मोटर्स

---

सामाजिक प्रश्न निर्माण होतील

मागील दोन महिन्यांपासून लोक व्यवसाय बंद करून घरी बसले आहेत. त्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता लॉकडाऊन वाढले तर सामाजिक प्रश्न निर्माण होतील. सामाजिक आरोग्य बिघडू नये, यासाठी व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी द्यावी.

राहुल मिश्रीकोटकर, संचालक, अरिहंत होंडा

--

कोट्यवधीचा सरकारी महसूल बुडाला

ऑटोमोबाईल उद्योगात सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग आहे. एकूण जीएसटीच्या ५० टक्के जीएसटी याच उद्योगातून दिला जातो. आरटीओची ऑनलाईन रजिस्ट्री महिनाभर बंद होती. याचाही परिणाम दिसून आला. वर्कशॉपवरही लॉकडाऊनचा परिणाम झाला. वाहन जीवनावश्यक वस्तू बनली आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी स्वतःचे वाहन असणे यास प्राधान्य दिले जात आहे.

संदेश झांबड

अध्यक्ष, चेंबर ऑफ अर्थोराईज डीलर्स असोसिएशन