शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक धास्तावले

By admin | Updated: July 22, 2014 00:17 IST

अकोला नि : जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पेरण्यांसह भाजीपाला उत्पादानावर मोठा परिणाम झाला आहे.

अकोला नि : जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पेरण्यांसह भाजीपाला उत्पादानावर मोठा परिणाम झाला आहे. अकोला निकळक परिसरात अल्पशा पाऊस पडला. भाजीपाल्यासाठी आवश्यक पाणी मिळत नसल्याने लावलेला भाजीपाला जगविण्यासाठी शेतकऱ्यांंची तारांबळ उडत आहे. परिसरात सर्वच भाज्यांचे भाव वधारले आहे. त्यामुळे जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.खरीप व रबी पिकासोबतच अनेक शेतकरी भाज्यापाल्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करून चांगले उत्पन घेत असतात. वेळेवर पाऊस होत नसल्याने पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. नवीन पालेभाज्या बाजारात येण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे परिसरात भाज्याचे भाव वाढले आहेत. वांगे ५० रूपये किलो, टमाटे ६० रूपये किलो, मिरची ६० रूपये किलो, मेथी १० व कोथिंबिरची एक जुडी १५ रूपये, कारले १५ रूपये पावशेर, पालकची एक जुडी १०रूपये, फुलकोबी १५ रूपये पावशेर, असे भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. गेल्या आठवडी बाजारात असा भाव असल्याने गृहिणींनी भाजीपाल्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र बदनापूरच्या आठवडी बाजारात बघायला मिळाले. अनेकांनी भाजीपाला खरेदीवर मर्यादा लावल्याचे सांगितले.पावसाने पाठ फिरविल्याने सर्वच भाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. अनेक गृहिणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करत होत्या.मात्र भाव वाढल्याने गृहिणींनी भाजीपाल्याची खरेदी कमी केली आहे. आमच्या व्यवसायावर याचा चांगलाच परिणाम झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)