शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

भररस्त्यात भाजीपाल्याची विक्री

By admin | Updated: December 20, 2015 23:49 IST

लोहारा : शहरात भाजी मंडई नसल्याने शिवाजी चौकातच रस्त्याच्या कडेला बसून जीव मुठीत धरुन भाजीपाला विक्री करण्याची वेळ शेतकरी

लोहारा : शहरात भाजी मंडई नसल्याने शिवाजी चौकातच रस्त्याच्या कडेला बसून जीव मुठीत धरुन भाजीपाला विक्री करण्याची वेळ शेतकरी व व्यापारी वर्गावर आली आहे. त्यामुळे नगर पंचायतीने येथे स्वतंत्र भाजीमंडई उभी करावी, अशी मागणी होत आहे.लोहारा हे शहर तालुक्याचे ठिकाण असून, येथे भाजीपाला विक्रेत्यांना स्वतंत्र जागा नाही. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळा, शहरातील शिवाजी चौकातील रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विक्री करावी लागते. पाणीटंचाईमुळे इतर पिके हाती न लागल्याने बहुतांश शेतकरी सध्या भाजीपाला व्यवसायाकडे वळाले आहेत. शहरातून जाणाऱ्या तिन्ही मुख्य रस्त्यावर दहा ते पंधरा किमी अंतरावर चार ते पाच गावे येतात. त्यामुळे येथे दररोज ग्रामीण भागातून भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाजी चौकात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असे. त्यातच बेशिस्त वाहने पार्र्कींग केली जात असल्याने चौकात नेहमीच वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होते. यात या भाजीपाला विक्रेत्यांची आणि बाजारकरूंची गर्दी होत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. गेल्याच आठवड्यात शिवाजी चौकात महिलेच्या पायावरुन ट्रक गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे नगरपंचायतने येथे स्वतंत्र भाजीमंडई उभी करावी, अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यातून होत आहे. दरम्यान, याबाबत नगरपंचायतीचे प्रभारी मुख्यधिकारी एन. के. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सध्या नगरपंचायतीचा कारभार प्रशासकावर आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच भाजीमंडईचा प्रश्न मिटू शकेल, असे त्यांनी सांगितले.