शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आवक वाढल्याने भाज्यांचे भाव घसरले

By admin | Updated: August 9, 2014 00:32 IST

गेवराई : मागील पंधरा दिवसांपूर्वी कडाडलेले भाजीपाल्याचे भाव आवक वाढल्याने घसरले आहेत. भाजीपाला स्वस्त होत असल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे.

गेवराई : मागील पंधरा दिवसांपूर्वी कडाडलेले भाजीपाल्याचे भाव आवक वाढल्याने घसरले आहेत. भाजीपाला स्वस्त होत असल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने भाजीपाल्याचे पीक कमी प्रमाणात घेण्यात आलेले आहे. मात्र मागील आठदिवसांपासून बाहेर जिल्ह्यातील भाजीपाला आयात केला जात असल्याने आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली. परिणामी ८० रुपये किलोने मिळणारी कोबी ४० ते ४५ रुपये किलोने ग्राहकांना मिळू लागली आहे. दुष्काळी स्थितीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे पीक घेतलेले नाही. यामुळे ग्राहकांना वाढीव पैसे देऊन भाजीपाला खरेदी करावा लागला. सध्या बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आठवडी बाजारामध्ये येत असल्याने भाव घसरत आहेत. मात्र घसरलेला भाजीपाला अजून किती दिवस कमी भावात ग्राहकांना मिळेल हे नक्की सांगता येणार नाही, असे येथील व्यापारी रफिक बागवान यांनी सांगितले. आज स्थितीत ८० रुपयांना मिळणारा दोडका ४० रुपये किलोवर आला आहे. या बरोबरच शेवगा, टोमॅटो, लसण, कांदे, कोबी, मेथी याचेही भाव घसरले आहेत. यामुळे गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढे बाहेरील जिल्ह्यातून भाजीपाला आला नाही तर केंव्हाही भाजीपाल्याचे भाव कडाडू शकतील, असे येथील व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(वार्ताहर)