शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

भाजीपाला मातीमोल

By admin | Updated: January 20, 2017 00:12 IST

बीड येथील बाजारपेठेत गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर गडगडले आहेत.

राजेश खराडे  बीडयेथील बाजारपेठेत गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर गडगडले आहेत. आडतीवर किलोवर होणारी विक्री व्यापाऱ्यांकडून कॅरेटवर केली जात आहे. सर्रास पालेभाज्यांची विक्री २ ते ३ रुपये प्रतिकिलोप्रमाणे होत आहे. रात्री उशिरापर्यंत विक्री न झाल्यास बसल्या ठिकाणीच शेतकरी भाजीपाला सोडून मार्गस्थ होत आहेत.मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीवर भर दिला होता. साधारणत: जून-जुलैमध्ये कांदा, बटाटा, टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. गत आठवड्यापर्यंत मेथी, पालक, चुका, हरभरा यांची विक्री १० रुपयांत ५ जुड्या याप्रमाणे होत होती, तर बटाटा, टोमॅटोला २० रुपये किलोचा दर असल्याने किमान रोजगार तरी उपलब्ध होत होता; मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासून ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर आवक होऊ लागली आहे. परिणामी सर्वच भाज्यांचे दर घसरले आहेत.गेल्या तीन वर्षांत दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यावेळी मात्र दर आकाशाला भिडले होते. सध्या अधिकचे उत्पादन झाल्यामुळे दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी होत आहे. बीड येथील खासबाग देवीच्या पाठीमागे भरल्या जाणाऱ्या बाजारात अहमदनगर, कर्जत, आष्टी, जामखेड, सोलापूर, उस्मानाबाद या ठिकाणांहून आवक होत आहे.५० रुपये कॅरेटप्रमाणे कोबी, टोमॅटो, बटाट्यांची खरेदी करून विक्रेते तोच माल भाजीमंडईत ३ ते ४ रुपये किलोने विकत आहे. एका कॅरेटमध्ये जवळपास २० किलो एवढ्या भाज्या मावतात. भाजी मंडईत अशी अवस्था असूनदेखील ग्राहकांकडून यापेक्षाही कमी दरात भाज्यांची मागणी होत आहे. त्यामुळे हताश होऊन विक्रेते आहे तसाच ठेवून मार्गस्थ होणे पसंत करीत आहेत.