शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

भाजीपाला मातीमोल

By admin | Updated: January 20, 2017 00:12 IST

बीड येथील बाजारपेठेत गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर गडगडले आहेत.

राजेश खराडे  बीडयेथील बाजारपेठेत गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर गडगडले आहेत. आडतीवर किलोवर होणारी विक्री व्यापाऱ्यांकडून कॅरेटवर केली जात आहे. सर्रास पालेभाज्यांची विक्री २ ते ३ रुपये प्रतिकिलोप्रमाणे होत आहे. रात्री उशिरापर्यंत विक्री न झाल्यास बसल्या ठिकाणीच शेतकरी भाजीपाला सोडून मार्गस्थ होत आहेत.मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीवर भर दिला होता. साधारणत: जून-जुलैमध्ये कांदा, बटाटा, टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. गत आठवड्यापर्यंत मेथी, पालक, चुका, हरभरा यांची विक्री १० रुपयांत ५ जुड्या याप्रमाणे होत होती, तर बटाटा, टोमॅटोला २० रुपये किलोचा दर असल्याने किमान रोजगार तरी उपलब्ध होत होता; मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासून ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर आवक होऊ लागली आहे. परिणामी सर्वच भाज्यांचे दर घसरले आहेत.गेल्या तीन वर्षांत दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यावेळी मात्र दर आकाशाला भिडले होते. सध्या अधिकचे उत्पादन झाल्यामुळे दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी होत आहे. बीड येथील खासबाग देवीच्या पाठीमागे भरल्या जाणाऱ्या बाजारात अहमदनगर, कर्जत, आष्टी, जामखेड, सोलापूर, उस्मानाबाद या ठिकाणांहून आवक होत आहे.५० रुपये कॅरेटप्रमाणे कोबी, टोमॅटो, बटाट्यांची खरेदी करून विक्रेते तोच माल भाजीमंडईत ३ ते ४ रुपये किलोने विकत आहे. एका कॅरेटमध्ये जवळपास २० किलो एवढ्या भाज्या मावतात. भाजी मंडईत अशी अवस्था असूनदेखील ग्राहकांकडून यापेक्षाही कमी दरात भाज्यांची मागणी होत आहे. त्यामुळे हताश होऊन विक्रेते आहे तसाच ठेवून मार्गस्थ होणे पसंत करीत आहेत.