शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विविध विमान कंपन्यांची सोमवारी शहरात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:39 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता देशांतर्गत सेवा देणाऱ्या सर्व प्रमुख विमान कंपन्या, जिल्ह्यातील उद्योग-व्यापार संघटना, लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचा पर्यटन विभाग, जिल्हाधिका-यांची संयुक्त बैठक नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सहसंचालिका उषा पाधी आणि रुबिना अली, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देऔरंगाबाद : पर्यटन विकासाला बळ देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता देशांतर्गत सेवा देणाऱ्या सर्व प्रमुख विमान कंपन्या, जिल्ह्यातील उद्योग-व्यापार संघटना, लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचा पर्यटन विभाग, जिल्हाधिका-यांची संयुक्त बैठक नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सहसंचालिका उषा पाधी आणि रुबिना अली, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सध्या औरंगाबाद येथून मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद या शहरांना जोडणारी एअर इंडिया आणि जेट एअर लाईन्स कंपनीची हवाईसेवा आहे. सोमवारी होणाºया बैठकीत एअर इंडिया, जेट एअरवेज, विस्तारा एअर लाईन्स, गो एअर, डेक्कन एअरलाइन्स आदी डोमेस्टिक कंपन्या सहभागी होणार आहेत.केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत औरंगाबादची कनेक्टिव्हिटी कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी असावी यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. औरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबतही चाचपणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी जयपूर-उदयपूर-दिल्ली, तसेच बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद या प्रमुख शहरांसह औरंगाबाद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सर्किटमध्ये समाविष्ट केल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खा. दानवे यांनी सांगितले.बहुतांश चिनी, जपानी, श्रीलंकन पर्यटक अजिंठा, वेरूळ पाहण्यासाठी येतात, त्यामुळे औरंगाबाद हे विमानतळ बुद्धिस्ट सर्किटला जोडले गेल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची जागृती होईल.मुंबई विमानतळालापर्याय ठरणारमुंबई विमानतळावरील गर्दीला पर्याय म्हणून, तसेच जागेअभावी काही विमाने अहमदाबाद येथे उतरवावी लागतात. अहमदाबादच्या तुलनेत औरंगाबाद मुंबईपासून जवळ आहे. तेथे मुक्कामासाठी येणारी विमाने औरंगाबादेत उतरवली जाऊ शकतात का, याचीही शक्यता तपासली जाईल. औरंगाबाद येथून विविध शहरांसाठी हवाई सेवा सुरू करता येईल या पयार्याची तपासणी करण्याची मागणी खा. दानवे यांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद