शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

विविध विमान कंपन्यांची सोमवारी शहरात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:39 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता देशांतर्गत सेवा देणाऱ्या सर्व प्रमुख विमान कंपन्या, जिल्ह्यातील उद्योग-व्यापार संघटना, लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचा पर्यटन विभाग, जिल्हाधिका-यांची संयुक्त बैठक नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सहसंचालिका उषा पाधी आणि रुबिना अली, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देऔरंगाबाद : पर्यटन विकासाला बळ देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता देशांतर्गत सेवा देणाऱ्या सर्व प्रमुख विमान कंपन्या, जिल्ह्यातील उद्योग-व्यापार संघटना, लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचा पर्यटन विभाग, जिल्हाधिका-यांची संयुक्त बैठक नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सहसंचालिका उषा पाधी आणि रुबिना अली, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सध्या औरंगाबाद येथून मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद या शहरांना जोडणारी एअर इंडिया आणि जेट एअर लाईन्स कंपनीची हवाईसेवा आहे. सोमवारी होणाºया बैठकीत एअर इंडिया, जेट एअरवेज, विस्तारा एअर लाईन्स, गो एअर, डेक्कन एअरलाइन्स आदी डोमेस्टिक कंपन्या सहभागी होणार आहेत.केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत औरंगाबादची कनेक्टिव्हिटी कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी असावी यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. औरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबतही चाचपणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी जयपूर-उदयपूर-दिल्ली, तसेच बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद या प्रमुख शहरांसह औरंगाबाद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सर्किटमध्ये समाविष्ट केल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खा. दानवे यांनी सांगितले.बहुतांश चिनी, जपानी, श्रीलंकन पर्यटक अजिंठा, वेरूळ पाहण्यासाठी येतात, त्यामुळे औरंगाबाद हे विमानतळ बुद्धिस्ट सर्किटला जोडले गेल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची जागृती होईल.मुंबई विमानतळालापर्याय ठरणारमुंबई विमानतळावरील गर्दीला पर्याय म्हणून, तसेच जागेअभावी काही विमाने अहमदाबाद येथे उतरवावी लागतात. अहमदाबादच्या तुलनेत औरंगाबाद मुंबईपासून जवळ आहे. तेथे मुक्कामासाठी येणारी विमाने औरंगाबादेत उतरवली जाऊ शकतात का, याचीही शक्यता तपासली जाईल. औरंगाबाद येथून विविध शहरांसाठी हवाई सेवा सुरू करता येईल या पयार्याची तपासणी करण्याची मागणी खा. दानवे यांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद