शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वाजपेयींना ठरले होते आर. आर. भारी!

By admin | Updated: February 17, 2015 00:39 IST

$$्रिप्रताप नलावडे / संजय तिपाले, बीड २००४ चा तो काळ... जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादीने तत्कालीन स्वच्छता व पाणीपुरवठा

 

$$्रिप्रताप नलावडे / संजय तिपाले, बीड२००४ चा तो काळ... जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादीने तत्कालीन स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री आर. आर. पाटील यांना बीडमध्ये पाठविले होते तर भाजपाने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पाचारण करुन राष्ट्रवादीचा तंबू हादरवून सोडला होता. मात्र, आर. आर. पाटील यांनी ‘शाईनिंग इंडिया’, ‘फिलगूड’ या भाजपाच्या आश्वसानास्त्रांना परतावून लावत राष्ट्रवादीला जय मिळवून दिला होता. आर. आर. यांच्या अशा अनेक आठवणी सोमवारी ताज्या झाल्या.आर. आर. पाटील यांचे बीडशी अतियश सलोख्याचे नाते होते. गटातटात विखुरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना एका मोळीत बांधण्याचे काम त्यांनी मोठ्या खुबीने केले. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबतच्या वैयक्तिक मैत्रीला धक्का लागू न देता त्यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला फुलविण्याचे काम करुन कुशल संघटक असल्याचे दाखवून दिले होते. भाजपाचे खासदार जयसिंग गायकवाड २००४ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार झाले होते. गायकवाड यांच्याविरोधात भाजपाने प्रकाश सोळंके यांना आखाड्यात उतरिवले होते. भाजपा व राष्ट्रवादीने संपूर्ण ताकद लावल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आग्रहाखातर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सोळंके यांच्यासाठी बीडमधील राजीव गांधी नगर परिसरात सभा घेतली होती. ‘शाईनिंग इंडिया, फिल गूड’ या मुद्द्यांची ढाल करुन भाजपाने तेंव्हा निवडणूका लढविल्या होत्या. वाजपेयींच्या सभेनंतर वातावरण भाजपामय झाले होते. मात्र, या वातावरणाला सुरुंग लावण्याचे काम केले होते आर. आर. पाटील यांनी. जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकावर बंदीचा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे हे पटवून देतानाच केंद्रात भाजपाचे सरकार आहे, मग तुम्ही का बंदी आणली नाही? असा रोकडा सवाल त्यांनी चंपावती मैदानावरील सभेत जाहीरपणे विचारला. पाटील यांच्या सभेनंतर वारे बदलले. निकाल जाहीर झाला. राष्ट्रवादीचे गायकवाड ४८ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. गायकवाड यांच्या विजयात आर. आर. यांचा सिंहाचा वाटा होता;पण त्यांनी ना याचे श्रेय घेतले ना भांडवल केले.आर. आर. यांनी बीडकरांचे प्रश्न पोटतिडकीने सोडविले. बीड- अहमदनगर- परळी रेल्वेमार्गासाठी ते शेवटपर्यंत आग्रही होते. ४स्त्री भू्रण हत्या, काळेगाव (ता. केज) रेडिओ स्फोट, अफू प्रकरण घडले तेंव्हा ते गृहमंत्री होते. ४तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांना मध्यरात्री फोन करुन त्यांनी रेडिओ स्फोटाचा छडा लागला पाहिजे, अशा सूचना केल्या होत्या. तपासानंतर कौतूक करुन पाच लाख रुपयांचे बक्षीसही दिले होते.आर. आर. पाटील यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गटबाजीला छेद देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. बीडमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर, विनायक मेटे या दोन तलवारी एका म्यानात आणण्याची किमया करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. २००९ मध्ये आष्टीत धस, धोंडे, दरेकर या त्रिकुटास एकत्रित आणून त्यांनी ‘थ्रिडी पॅटर्न’ चा ऐतिहासिक चमत्कार केला होता. शिवाय गेवराईत दोन पंडितांमधील ताकद राष्ट्रवादीच्या मागे उभी करुन पक्षाला बळ देण्याच्या कामातही आर. आर. यांची भूमिका महत्त्वाची होती.