शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत वैजापूर अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:02 IST

बााबासाहेब धुमाळ वैजापूर : जिल्ह्यातील दुष्काळी भागात केलेल्या विविध योजनेच्या अंमलबजावणीत वैजापूर कृषी उपविभाग राज्यात अव्वल ठरला आहे. नानाजी ...

बााबासाहेब धुमाळ

वैजापूर : जिल्ह्यातील दुष्काळी भागात केलेल्या विविध योजनेच्या अंमलबजावणीत वैजापूर कृषी उपविभाग राज्यात अव्वल ठरला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पात वैजापूरने राज्यात सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्यापाठोपाठ सिल्लोड व हिंगोली कृषी उपविभागाने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. दुष्काळी मराठवाड्यात पोकरातून अनेक शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग सापडला असल्याचे पुढे आले आहे.

राज्यातील मराठवाडा व विदर्भ हे विभाग कायम दुष्काळ व अवर्षणग्रस्त म्हणून ओळखले जातात. सध्या वेगाने होणाऱ्या हवामान बदलामुळे या भागातील शेती अधिक जोखीम व नुकसानीची ठरली आहे. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, दरडोई घटत जाणारी जमीन धारणा, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे घटते प्रमाण हे सुद्धा या भागाच्या अडचणीत आणखी भर घालतात. याचा परिणाम म्हणून मराठवाडा व विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. वेगाने होणारे हवामानातील बदल आपण थांबवू शकत नाही. परंतु बदलांशी शेती पद्धती जुळवून घेणे व अनुकूल करणे एवढेच आपल्या हातात आहे.

यासाठी राज्य सरकारने २०१८ - २०१९ पासून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मराठवाडा व विदर्भातील १५ जिल्ह्यातील ५ हजार १२० गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोरडवाहू शेती करणाऱ्या अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विविध घटकांचा लाभ अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. वैजापूर कृषी उपविभाग अंतर्गत वैजापूर, गंगापूर व खुलताबाद हे तीन तालुके येतात. उपविभागातील १३५ गावांची निवड पोकरा प्रकल्पासाठी झाली आहे. या गावातील १७ हजार ४२२ लाभार्थ्यांना विविध घटकांचा ९३ कोटी ४३ लाख एवढ्या अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने सामूहिक शेततळे (२०७), वैयक्तिक शेततळे खोदकाम (४२२), शेततळे अस्तरीकरण (५०८), ठिंबक सिंचन संच (५,६८१), तुषार सिंचन संच (५,०१४), इलेक्ट्रीक / डिझेल पंप (२,८१२), पाईपलाईन (१,१३१), शेडनेट गृह व पाॅलि हाऊस (१६१), फळबाग लागवड (१०९३), तुती लागवड व रेशीम कीटक संगोपन (१५४), शेततळ्यातील मत्स्य पालन (८३), शेळीपालन (७६) आदी घटकांचा लाभ देण्यात आला आहे.

शेततळ्यामुळे संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. ठिंबक व तुषार सिंचनाचा वापर वाढल्याने दुबार पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. बहु वार्षिक फळबागा व भाजीपाला पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. शेडनेटग‌ृह घटकांचा लाभ घेऊन कमी क्षेत्रात व कालावधीत अधिक उत्पादन मिळू लागले आहे. कृषी उपविभागात ८१ शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांना अवजार बँका, स्वच्छता व प्रतवारी केंद्र, दाळ मिल, दूध शीतकरण गृह, मुरघास युनिट आदी बाबींचा लाभ देण्यात आला आहे.

---- कोट ------

पोकरा योजनेमुळे तिन्ही दुष्काळी व अवर्षण प्रवण तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळाला आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे शेतमालाचे उत्पादन वाढल्याने हा प्रकल्प कोरडवाहू भागासाठी वरदान ठरला आहे.

- प्रकाश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी

--- फोटो सह

230621\img-20210622-wa0223.jpg

पोखरा योजनेअंतर्गत सामूहिक शेततळे तुती लागवड यांचे फोटो