शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

वैजापूर-श्रीरामपूर मार्ग पुरामुळे झाला ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:49 IST

पूरामुळे वैजापूर-श्रीरामपूर मार्गावरील वाहतूक मंगळवारी (दि.१०) रात्री उशिरापर्यंत ठप्प होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पुणतांबा गावाजवळच्या डोणगाव (ता.वैजापूर) पुलावरून गोदावरीचे पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे डोणगाव येथील नागरिकांना पुणतांबा येथे जाण्यास अडचण होत आहे. या पूरामुळे वैजापूर-श्रीरामपूर मार्गावरील वाहतूक मंगळवारी (दि.१०) रात्री उशिरापर्यंत ठप्प होती.वैजापूर तालुक्यातील गोदावरी काठावरचे डोणगाव हे गाव पुणतांब्याजवळ आहे. पुणतांबा व श्रीरामपूर ही नगर जिल्ह्यातील गावे डोणगावच्या नागरिकांना सोयीची व जवळची असल्याने तेथील विद्यार्थी शाळा व कॉलेजसाठी तिकडे जातात. मात्र, पुणतांब्याकडे जाणाºया पुलावर जोरदार पावसामुळे पाणी आल्याने दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही.परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे डोणगाव येथील शेतकरी धनंजय धोर्डे यांनी सांगितले. परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्यास डोणगावसह अन्य गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.सिल्लोडमध्ये सर्वदूर मध्यम पाऊससिल्लोड : सिल्लोड शहर व तालुक्यातील सोमवारी आणि मंगळवारी मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे मका, सोयाबीन, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले.तालुक्यातील गोळेगाव, भराडी, घाटनांद्रा, अंभई, अजिंठा, शिवना, निल्लोड, केळगाव, सारोळा, उंडणगाव, पालोद, बनकीन्होळा सर्कल मध्ये सोमवारी व मंगळवारी कुठे मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे मका, सोयाबीन, कापसाचे नुकसान झाले.सिल्लोड तालुक्यात सोमवारी (दि.९)८ मि.मी. पावसाची नोंद झाली. गोळेगाव मंडळात २३ तर अंभई मंडळात १४ मि.मी पावसाची नोंद झाली. तर मंगळवारीही (दि.१०) बºयाच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.तालुक्यातील आधारवाडी-कोºहाळा भागात जोरदार पाऊस झाल्याने सिल्लोड शहराला पाणी पुरवठा करणाºया खेळणा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली आहे. तालुक्यातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प, खेलना प्रकल्पात अजूनही मृत साठा आहे.बाजारसावंगीत जोरदार पाऊसबाजारसावंगी : परिसरात मंगळवारी (दि.१०) ४ वाजता जोरदार पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी बाजारसावंगीसह येसगाव, शेलगाव, जानेफळ, ममुराबादवाडी, लोणी, बोडखा, कनकशिळ, रेल, इंदापूर, झरी, वडगाव परिसरात दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास जवळपास दीड तास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मका, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका बसला. शेतक-यांनी परिसरात बहुतांश ठिकाणी मक्याची सोंगणी केली होती. मात्र, पावसामुळे मक्याचे प्रचंड नुकसान झाले. तसेच वेचणीला आलेला कापूस भिजल्याने शेतक-यांच्या अडचणीत भर पडली. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.