शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

वैजापूर-श्रीरामपूर मार्ग पुरामुळे झाला ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:49 IST

पूरामुळे वैजापूर-श्रीरामपूर मार्गावरील वाहतूक मंगळवारी (दि.१०) रात्री उशिरापर्यंत ठप्प होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पुणतांबा गावाजवळच्या डोणगाव (ता.वैजापूर) पुलावरून गोदावरीचे पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे डोणगाव येथील नागरिकांना पुणतांबा येथे जाण्यास अडचण होत आहे. या पूरामुळे वैजापूर-श्रीरामपूर मार्गावरील वाहतूक मंगळवारी (दि.१०) रात्री उशिरापर्यंत ठप्प होती.वैजापूर तालुक्यातील गोदावरी काठावरचे डोणगाव हे गाव पुणतांब्याजवळ आहे. पुणतांबा व श्रीरामपूर ही नगर जिल्ह्यातील गावे डोणगावच्या नागरिकांना सोयीची व जवळची असल्याने तेथील विद्यार्थी शाळा व कॉलेजसाठी तिकडे जातात. मात्र, पुणतांब्याकडे जाणाºया पुलावर जोरदार पावसामुळे पाणी आल्याने दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही.परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे डोणगाव येथील शेतकरी धनंजय धोर्डे यांनी सांगितले. परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्यास डोणगावसह अन्य गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.सिल्लोडमध्ये सर्वदूर मध्यम पाऊससिल्लोड : सिल्लोड शहर व तालुक्यातील सोमवारी आणि मंगळवारी मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे मका, सोयाबीन, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले.तालुक्यातील गोळेगाव, भराडी, घाटनांद्रा, अंभई, अजिंठा, शिवना, निल्लोड, केळगाव, सारोळा, उंडणगाव, पालोद, बनकीन्होळा सर्कल मध्ये सोमवारी व मंगळवारी कुठे मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे मका, सोयाबीन, कापसाचे नुकसान झाले.सिल्लोड तालुक्यात सोमवारी (दि.९)८ मि.मी. पावसाची नोंद झाली. गोळेगाव मंडळात २३ तर अंभई मंडळात १४ मि.मी पावसाची नोंद झाली. तर मंगळवारीही (दि.१०) बºयाच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.तालुक्यातील आधारवाडी-कोºहाळा भागात जोरदार पाऊस झाल्याने सिल्लोड शहराला पाणी पुरवठा करणाºया खेळणा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली आहे. तालुक्यातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प, खेलना प्रकल्पात अजूनही मृत साठा आहे.बाजारसावंगीत जोरदार पाऊसबाजारसावंगी : परिसरात मंगळवारी (दि.१०) ४ वाजता जोरदार पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी बाजारसावंगीसह येसगाव, शेलगाव, जानेफळ, ममुराबादवाडी, लोणी, बोडखा, कनकशिळ, रेल, इंदापूर, झरी, वडगाव परिसरात दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास जवळपास दीड तास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मका, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका बसला. शेतक-यांनी परिसरात बहुतांश ठिकाणी मक्याची सोंगणी केली होती. मात्र, पावसामुळे मक्याचे प्रचंड नुकसान झाले. तसेच वेचणीला आलेला कापूस भिजल्याने शेतक-यांच्या अडचणीत भर पडली. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.