शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

अवघी वैजापूरनगरी साईचरणी लीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:32 IST

दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री साईभक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ‘साईची वारी, शिर्डीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत शहरातील १५ हजार साईभक्तांनी वैजापूर ते शिर्डी पायी दिंडीमध्ये सहभाग नोंदवत गेल्या नऊ वर्षांचा विक्रम मोडला. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण रस्त्यावर सार्इंचाच जयघोष ऐकू आला. शहरातील १५ हजार भाविक शिर्डीत असल्यामुळे गुरुवारी वैजापूरनगरीत शुकशुकाट जाणवला.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री साईभक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ‘साईची वारी, शिर्डीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत शहरातील १५ हजार साईभक्तांनी वैजापूर ते शिर्डी पायी दिंडीमध्ये सहभाग नोंदवत गेल्या नऊ वर्षांचा विक्रम मोडला. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण रस्त्यावर सार्इंचाच जयघोष ऐकू आला. शहरातील १५ हजार भाविक शिर्डीत असल्यामुळे गुरुवारी वैजापूरनगरीत शुकशुकाट जाणवला.सार्इंच्या गजरात तल्लीन झालेल्या वैजापूरकरांमुळे शहराला शिर्डीची शोभा आली होती. वृक्षलागवड, स्वच्छता, पर्यावरण असे विविध विषय हाती घेऊन वारकरी संप्रदायासोबत माळकरी आणि टाळकरी विद्यार्थीही दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, नयनरम्य पालखी सोहळ्याने वैजापूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.टाळ-मृदंगामुळे वातावरणात साईंचाच गजर ऐकू येत होता. विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत वारकºयांच्या सेवेसाठी रस्त्यावर स्टॉल लावले होते. पहाटे चार वाजता शहरातील महादेव मंदिरापासून साईबाबांच्या पालखीसह शिर्डी दिंडीस सुरुवात झाली.यावेळी माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, संस्थेचे अध्यक्ष विशाल संचेती, कैलास साखरे, योगिता साखरे, राजेंद्र लालसरे, रेवती लालसरे, आशाबाई आगळे, प्रशांत गायकवाड, नितीन लुनावत, शुभम् लालसरे, मनोज दौडे व सुधीर लालसरे यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली.नागपूर-मुंबई महामार्गावरील आठ तासांच्या प्रवासादरम्यान वैजापूर पालिका, साईभक्त, महादेव मित्र मंडळ व इतर संस्थांच्या वतीने दिंडीतील भाविकांसाठी चहा, नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी एक वाजता दिंडी शिर्डीत पोहोचल्यानंतर या भाविकांसाठी साई संस्थानने दर्शनाची व्यवस्था केली होती.च्पहाटे चार वाजता शहरातील महादेव मंदिरापासून साईबाबांच्या पालखीसह शिर्डी दिंडीस सुरुवात झाली. तब्बल ४२ कि.मी. अंतर आठ ते नऊ तासात पूर्ण करण्यात आले. पालखी वैजापुरातून जाणार म्हणून रस्ते झाडून पुसून स्वच्छ केले होते. पालखी मार्गावर सडासारवण-रांगोळ्या काढल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. बेलगाव, सटाणा, कोपरगावमार्गे दुपारी एक वाजता साईभक्त शिर्डीला पोहोचले.कोट्यवधींची उलाढाल थांबलीगुरुवारी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, शैक्षणिक संस्था, छोट्या दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ जवळपास बंद असल्याचे दिसले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली. विशेष म्हणजे व्यापाºयांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवून पायी दिंडीत सहभाग नोंदविला.नजर जाईल तिथपर्यंत भक्तसागरच्पायी दिंडीत दहा वर्षांपासून ते सत्तर वर्षे वयोगटातील भाविक सहभागी झाले होते. कुणी गप्पा टप्पा करत तर कुणी भजन म्हणत, काही तर मौन पाळत भक्तिभावाने निघाले. नजर जाईल तिथपर्यंत भक्तसागर दिसला.अर्धे भाविक अनवाणीच्अर्ध्यापेक्षा जास्त भक्त अनवाणी पायाने चालत होते. जमीन भरपूर तापलेली पण थंड वारा मन उल्हासित करत होता. डोक्यामध्ये साईचरणाचेच विचारचक्र चालू झाले होते.च्सारे जण सार्इंच्या दर्शनासाठी आतूर झाले होते. रस्त्यात ठिकठिकाणी खिचडी, पोहे, आईस्क्रीम, उसाचा रस, पाणी वाटप केले जात होते.