शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

गरज सरो वैद्य मरो, ७८३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना देणार नारळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:03 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेसाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली. कालपर्यंत ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेसाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली. कालपर्यंत ‘कोरोनायोद्धे’ असलेले हे कर्मचारी आता शासनालाही जड झाले आहेत. गरज सरो वैद्य मरो... प्रमाणे लवकरच तब्बल ७८३ कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी झाली आहे. कर्मचारी कमी करण्याचा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. मागील पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. अनेक कर्मचाऱ्यांकडे ड्युटीवर जाण्यासाठीही आता पैसे नाहीत. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून संपूर्ण खर्च शासनाकडूनच करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी मनपाला निधी उपलब्ध करून देण्यात आला. मनपाने जिल्हा प्रशासनाकडे जवळपास ६८ कोटी रुपयांची मागणी केली आहे. अद्याप निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. ७८३ कर्मचाऱ्यांच्या पगाराला दरमहिन्याला २ कोटी ५९ लाख ३३ हजार रुपये लागतात. पाच महिन्यांची थकीत रक्कम जवळपास १३ कोटीपर्यंत पोहोचली आहे. तिसरी लाट कधी येईल, हे निश्चित नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसवून पगार द्यायचा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर केल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

कोरोना गेला, नोकरी गेली!

कंत्राटीचा प्रकार - किती घेतले

कंत्राटी डॉक्टर - ३३०

अधिपरिचारिका - १३९

पॅरामेडिकल स्टाफ - १८४

कंत्राटी कर्मचारी - ११३०

आता जगायचे कसे?

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. पेट्रोल, चहा-नाश्ता करण्यासाठी घरातून पैसे आणावे लागतात. चार महिने पगार मिळत नसेल तर घर तरी कसे चालवावे? एकीकडे ‘कोरोनायोद्धा’ म्हणायचे, दुसरीकडे याच योद्ध्यांना पगारासाठी पाच महिने थांबवून ठेवायचे, ही कोणती पद्धत आहे?

कंत्राटी कर्मचारी

पैशांची खूप गरज होती म्हणून जीव धोक्यात घालून कोरोनात काम करण्याचा निर्णय घेतला. या संसर्गामुळे आपला जीवही जाऊ शकतो याची जाणीव असतानाही हे काम करीत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्याचा जीव गेला तरी प्रशासन एक रुपयाही देणार नाही. पोटाची खळगी भागविण्यासाठी वेळेवर पगार तरी द्यावा.

कंत्राटी कर्मचारी

कंत्राटी कर्मचारी संघटना आक्रमक

ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे, त्यांना दोन-चार महिने पगार झाला नाही तरी चालते. अनेक कर्मचारी सर्वसामान्य, गोरगरीब कुटुंबातील आहेत. त्यांना संसाराचा गाडा चालविण्यासाठी पैशांची नितांत गरज आहे. उधारीवर ते किती दिवस जगतील. प्रशासनानेही कुठेतरी गांभीर्याने विचार करायला हवा. संपूर्ण पगार दिल्यानंतरच कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घ्यावा. नंतर पगारासाठी आम्ही मनपाचे उंबरठे झिजवावेत का?

अध्यक्ष, कर्मचारी संघटना.

तिसरी लाट आली तर...

तिसरी लाट कधी येईल, हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर दरमहा अडीच कोटी रुपये खर्च करणे प्रशासनाला अशक्य आहे. तिसरी लाट आली तर परत जाहिरात देऊन कंत्राटी कर्मचारी बोलावण्यात येतील. कंत्राटी भरतीची फक्त ३ दिवसांची प्रक्रिया आहे. पण, सध्या कोट्यवधी रुपये खर्च करणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

शासन आदेशानुसार कारवाई

औरंगाबाद महापालिका वगळता इतर आरोग्य विभागांनी कोविडमध्ये घेतलेले कंत्राटी कर्मचारी अगोदरच कमी केले आहेत. औरंगाबाद महापालिकेने तिसरी लाट येईल म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले नाही. शासन आदेशानुसार कर्मचारी कमी करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. हा सर्व निर्णय जिल्हा प्रशासनाशी निगडित आहे.

डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

डमी-- (१०३६)