शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गरज सरो वैद्य मरो, ७८३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना देणार नारळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:03 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेसाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली. कालपर्यंत ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेसाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली. कालपर्यंत ‘कोरोनायोद्धे’ असलेले हे कर्मचारी आता शासनालाही जड झाले आहेत. गरज सरो वैद्य मरो... प्रमाणे लवकरच तब्बल ७८३ कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी झाली आहे. कर्मचारी कमी करण्याचा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. मागील पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. अनेक कर्मचाऱ्यांकडे ड्युटीवर जाण्यासाठीही आता पैसे नाहीत. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून संपूर्ण खर्च शासनाकडूनच करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी मनपाला निधी उपलब्ध करून देण्यात आला. मनपाने जिल्हा प्रशासनाकडे जवळपास ६८ कोटी रुपयांची मागणी केली आहे. अद्याप निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. ७८३ कर्मचाऱ्यांच्या पगाराला दरमहिन्याला २ कोटी ५९ लाख ३३ हजार रुपये लागतात. पाच महिन्यांची थकीत रक्कम जवळपास १३ कोटीपर्यंत पोहोचली आहे. तिसरी लाट कधी येईल, हे निश्चित नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसवून पगार द्यायचा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर केल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

कोरोना गेला, नोकरी गेली!

कंत्राटीचा प्रकार - किती घेतले

कंत्राटी डॉक्टर - ३३०

अधिपरिचारिका - १३९

पॅरामेडिकल स्टाफ - १८४

कंत्राटी कर्मचारी - ११३०

आता जगायचे कसे?

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. पेट्रोल, चहा-नाश्ता करण्यासाठी घरातून पैसे आणावे लागतात. चार महिने पगार मिळत नसेल तर घर तरी कसे चालवावे? एकीकडे ‘कोरोनायोद्धा’ म्हणायचे, दुसरीकडे याच योद्ध्यांना पगारासाठी पाच महिने थांबवून ठेवायचे, ही कोणती पद्धत आहे?

कंत्राटी कर्मचारी

पैशांची खूप गरज होती म्हणून जीव धोक्यात घालून कोरोनात काम करण्याचा निर्णय घेतला. या संसर्गामुळे आपला जीवही जाऊ शकतो याची जाणीव असतानाही हे काम करीत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्याचा जीव गेला तरी प्रशासन एक रुपयाही देणार नाही. पोटाची खळगी भागविण्यासाठी वेळेवर पगार तरी द्यावा.

कंत्राटी कर्मचारी

कंत्राटी कर्मचारी संघटना आक्रमक

ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे, त्यांना दोन-चार महिने पगार झाला नाही तरी चालते. अनेक कर्मचारी सर्वसामान्य, गोरगरीब कुटुंबातील आहेत. त्यांना संसाराचा गाडा चालविण्यासाठी पैशांची नितांत गरज आहे. उधारीवर ते किती दिवस जगतील. प्रशासनानेही कुठेतरी गांभीर्याने विचार करायला हवा. संपूर्ण पगार दिल्यानंतरच कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घ्यावा. नंतर पगारासाठी आम्ही मनपाचे उंबरठे झिजवावेत का?

अध्यक्ष, कर्मचारी संघटना.

तिसरी लाट आली तर...

तिसरी लाट कधी येईल, हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर दरमहा अडीच कोटी रुपये खर्च करणे प्रशासनाला अशक्य आहे. तिसरी लाट आली तर परत जाहिरात देऊन कंत्राटी कर्मचारी बोलावण्यात येतील. कंत्राटी भरतीची फक्त ३ दिवसांची प्रक्रिया आहे. पण, सध्या कोट्यवधी रुपये खर्च करणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

शासन आदेशानुसार कारवाई

औरंगाबाद महापालिका वगळता इतर आरोग्य विभागांनी कोविडमध्ये घेतलेले कंत्राटी कर्मचारी अगोदरच कमी केले आहेत. औरंगाबाद महापालिकेने तिसरी लाट येईल म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले नाही. शासन आदेशानुसार कर्मचारी कमी करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. हा सर्व निर्णय जिल्हा प्रशासनाशी निगडित आहे.

डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

डमी-- (१०३६)