शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

लसची महिनाभरासाठी चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंध लस घेण्यासाठी शहरात सर्वसामान्य नागरिक आरोग्य केंद्रांवर गर्दी करीत आहेत. मात्र, शासनाकडून मुबलक प्रमाणात साठा ...

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंध लस घेण्यासाठी शहरात सर्वसामान्य नागरिक आरोग्य केंद्रांवर गर्दी करीत आहेत. मात्र, शासनाकडून मुबलक प्रमाणात साठा मिळत नसल्याने नागरिकांना पहिल्या, दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत होती. आता पुढील महिनाभर तरी जिल्ह्याला लसची टंचाई जाणवणार नाही. बजाज कंपनी काॅर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गंत २ लाख ३० हजार डोस उपलब्ध करून देत आहे. याशिवाय शासनाकडून दर आठवड्याला २० ते २५ हजार डोस मिळणार आहेत.

१६ जानेवारी २०२१ ते ऑगस्ट या सात महिन्यांत शहर व ग्रामीण भागात पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३०.१९ एवढी आहे. दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचा टक्का १०.९४ एवढा आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दिष्ट ३२ लाख ८७ हजार ८४ एवढे निश्चित झाले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळायला तयार नाही. आठवड्यातून चार ते पाच दिवस लस नसल्याने आरोग्य यंत्रणेला मोहीम बंद ठेवावी लागते. बजाज समूहाने सीएआरमधून शहराला १ लाख १५ हजार, तर ग्रामीणलाही १ लाख १५ हजार डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी हा साठा प्राप्त होण्याची शक्यता महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तविली आहे.