शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

कोरोनामुक्तीसाठी लस ठरतेय मोठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शहरी भागात महापालिका प्रशासनाने योग्य वेळी केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे. ...

औरंगाबाद : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शहरी भागात महापालिका प्रशासनाने योग्य वेळी केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे. संक्रमण रोखण्यात लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी महापालिकेने व्यापक लसीकरण मोहीम सुरू केली. शासनाकडून साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरात आतापर्यंत दोन लाख नागरिकांना लस देण्यात आली. शुक्रवारी दुपारी अचानक लस संपल्यामुळे मोहीम थांबवावी लागली.

केंद्र शासनाने ३० एप्रिलपर्यंत ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे निर्देश दिले. शहरात ११५ वॉर्डांमध्ये १४० टीम खास लसीकरणासाठी नेमण्यात आल्या. लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. दररोज सहा ते सात हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे. शुक्रवारी महापालिकेकडे असलेला लसचा साठा अचानक संपला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने दररोज दहा हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. शहरात ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या पाच लाख एवढी आहे. आतापर्यंत २ लाख लस मनपाला देण्यात आल्या. त्या शुक्रवारी संपल्या. प्रशासनाला ८० पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे दुपारनंतर बंद करावी लागली. आरोग्य क्षेत्रातील जाणकार मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सध्या लस हेच एक प्रभावी शस्त्र आहे. भविष्यात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण वरदान ठरेल. शासन आदेशानुसार आता महापालिका प्रशासनाने अठरा वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येकाला लस देण्याचे नियोजन केले आहे. दहा लाख नागरिकांना लस द्यावी लागणार आहे. ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या पाच लाख नागरिकांना अद्याप पूर्ण लस मिळालेली नाही. अशा परिस्थितीत नवीन उद्दिष्ट कसे पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. १,२०० वरून रुग्णसंख्या ५०० पर्यंत आली. मृत्यूदरही नियंत्रणात आहे. कोरोनाचा मुकाबला करताना जिल्हा प्रशासनासह पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा होत असताना राज्य शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पालकमंत्री सुभाष देसाई हेसुद्धा लस तुटवडा प्रकरणात लक्ष घालू शकतात.

कोट...

लवकरच लस उपलब्ध होईल

लसीकरण मोहीम राबविण्यासाठी महापालिकेकडून साठा सध्या संपलेला आहे. आम्हाला लवकरच लसचा साठा उपलब्ध होईल. त्यानंतर आम्ही पुन्हा नव्या जोमाने लसीकरण मोहीम सुरू करणार आहोत.

-आस्तिककुमार पाण्डेय, मनपा प्रशासक