शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्तीसाठी लस ठरतेय मोठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शहरी भागात महापालिका प्रशासनाने योग्य वेळी केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे. ...

औरंगाबाद : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शहरी भागात महापालिका प्रशासनाने योग्य वेळी केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे. संक्रमण रोखण्यात लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी महापालिकेने व्यापक लसीकरण मोहीम सुरू केली. शासनाकडून साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरात आतापर्यंत दोन लाख नागरिकांना लस देण्यात आली. शुक्रवारी दुपारी अचानक लस संपल्यामुळे मोहीम थांबवावी लागली.

केंद्र शासनाने ३० एप्रिलपर्यंत ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे निर्देश दिले. शहरात ११५ वॉर्डांमध्ये १४० टीम खास लसीकरणासाठी नेमण्यात आल्या. लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. दररोज सहा ते सात हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे. शुक्रवारी महापालिकेकडे असलेला लसचा साठा अचानक संपला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने दररोज दहा हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. शहरात ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या पाच लाख एवढी आहे. आतापर्यंत २ लाख लस मनपाला देण्यात आल्या. त्या शुक्रवारी संपल्या. प्रशासनाला ८० पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे दुपारनंतर बंद करावी लागली. आरोग्य क्षेत्रातील जाणकार मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सध्या लस हेच एक प्रभावी शस्त्र आहे. भविष्यात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण वरदान ठरेल. शासन आदेशानुसार आता महापालिका प्रशासनाने अठरा वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येकाला लस देण्याचे नियोजन केले आहे. दहा लाख नागरिकांना लस द्यावी लागणार आहे. ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या पाच लाख नागरिकांना अद्याप पूर्ण लस मिळालेली नाही. अशा परिस्थितीत नवीन उद्दिष्ट कसे पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. १,२०० वरून रुग्णसंख्या ५०० पर्यंत आली. मृत्यूदरही नियंत्रणात आहे. कोरोनाचा मुकाबला करताना जिल्हा प्रशासनासह पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा होत असताना राज्य शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पालकमंत्री सुभाष देसाई हेसुद्धा लस तुटवडा प्रकरणात लक्ष घालू शकतात.

कोट...

लवकरच लस उपलब्ध होईल

लसीकरण मोहीम राबविण्यासाठी महापालिकेकडून साठा सध्या संपलेला आहे. आम्हाला लवकरच लसचा साठा उपलब्ध होईल. त्यानंतर आम्ही पुन्हा नव्या जोमाने लसीकरण मोहीम सुरू करणार आहोत.

-आस्तिककुमार पाण्डेय, मनपा प्रशासक